पुणे:वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, मेडिकल इक्विपमेंट पार्कनंतर आता टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप होत आहे. या मुद्द्यावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे.
राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांचं एकच इंजिन आहे, तरी फेल का होतंय? असा सवाल आदित्य ठाकरेंना केला केंद्र सरकारला केलाआहे. यासोबतच त्यापेक्षा तर आमचंच चांगलं चाललं होतं केंद्रासोबत.असा टोलाही त्यांनी लगावला
साहित्य ठाकरे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, वेदांता बद्दल त्यांना माहित नव्हतं तसं एअरबस बद्दलही माहित नव्हतं. या राज्याचे मंत्री खोटं बोलत आहेत का? आम्ही दिल्लीला जाऊन पंतप्रधानांनी बोलू असं का सांगितलं? करार झाला हे माहित असूनही त्यांनी ते का सांगितलं नाही? खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकाचा विश्वास नाही, त्यामुळेच उद्योग राज्याबाहेर जातायत”.
मुख्यमंत्र्यांवर टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “आपले मुख्यमंत्री मंडळ, दहीहंडी, राजकीय भेटी फोडाफोडी हे सोडून काही करत नाही. दुसऱ्या राज्यात जाऊन मुख्यमंत्र्यांनी काही उद्योग आणलेलं नाही. राज्यात हे काय गुंतवणूक आणणार? जसं शिवराजसिंह चौहान, नवीन पटनायक आपल्या राज्यात आले उद्योजकांशी चर्चा केली, आपल्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं?”असा सवाल ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला.
दुसऱ्या राज्यात जाऊन मुख्यमंत्री यांनी काही आणलेलं नाही. कृषिमंत्री कोण आहेत हे शेतकऱ्यांना माहीत नाही. उद्योजकांना उद्योगमंत्री माहीत नाहीत. या राज्यात नेमकं चाललंय काय? असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला.
छोटा पप्पू पहिले बोलले असते तर आज ही वेळ आली नसती असं सांगत मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे. छोटा पप्पू म्हणत सत्तारांनी आदित्य ठाकरेंना चिडवलं होतं. आता, आदित्य यांनी सत्तारांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
त्यांच्यासोबत बसत नाही, आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जे विचारलं ते मी करत नाही. म्हणून त्यांना वाईट वाटत आहे, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी अब्दुल सत्तार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
शहरात पाणी तुंबत आहे यावर काम व्हायला हवं. तसंच पुणे पालिकेतून इलेक्ट्रीत बससोबतच EV बाईक, शॉर्ट बस सुरु करण्याबाबत चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पाऊसामुळे पुण्यात जे पाणी तुंबलं आहे तो विषय गंभीर आहे.
पुण्यातील नद्यांचा विकास झाला पाहिजे, पर्यावरणवाद्यांना सोबत घेऊन काम व्हायला हवं. पर्यावरण आणि शहरीकरण. यावर माझी कायम चर्चा होत असते पण शहरीकरणामुळे मी चिंतेत आहे. असंही ठाकरे यावेळी म्हणाले.