मुंबई- खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर आंदोलन करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यानंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून सत्तारांचे कान टोचत त्यांना पुन्हा एकदा माफी मागण्याच्या सूचना केल्याचे समजते.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या मुंबईतील घरावर हल्लाबोल केला असून काचा, खिडक्यांचीही तोडफोड केली. तर ठाणे, पुणे, औरंगाबादसह सर्वच ठिकाणी आंदोलन करून त्यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळण्यात आला.
पन्नास खोक्यांचा आरोप कुणी तरी केला. त्यावर कुणीही आम्ही ते घेतले नाही हे कोणीच म्हटले नाहीत. त्यांनी खोक्याचे आरोप फेटाळले नाहीत. हे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे या्ंनी व्यक्त केले होते. त्यावर अब्दुल सत्तारांची जीभ घसरली. त्यांनी थेट सुप्रिया सुळे यांना टार्गेट करीत भिकार असे व्यक्तव्य केले आहे. याचविरोधात राज्यभर संताप सुरू आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले असून हा महिला वर्गाचा अपमान आहे. सत्तार यांच्या वक्तव्यामुळे राज्यात संताप असून त्या्ंच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली असून याबाबत महेश तपासे यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्र्मक झाले असून सत्तारांना माफी नाहीच असा पावित्रा त्यांनी घतला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. यानंतर सत्तारांच्या पुतळ्याचे दहनही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले. तसेच पुतळ्याला चपलाचा हार घालून जोडेही मारण्यात आले.
माज उतरवला जातो- जितेंद्र आव्हाड
अब्दुल सत्तार इस्लाम धर्मातील आहे. येथे मुस्लिम महिला आहेत. ईस्लाम महिला आहेत त्या काय म्हणत आहेत हे तुम्ही बघा असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली. अब्दुल सत्तारांना माज आला आहे. हा माज उतरवला जातो. लोकशाहीत असा माज तर उतरवलाच जातो.
सत्तारांना फिरू देणार नाही- विद्या चव्हाण
आमदार विद्या चव्हाण यांनी संतप्त प्रतिक्रीया देताना सांगितले की, सत्तारांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करा. सत्तारांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यांना विधानसभेत बसण्याचा काहीही अधिकार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी याची दखल घ्यावी, सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही.