पुणे- स्वर्गीय इंदिरा गांधी आणि स्वर्गीय राजीव गांधी यांच्या घरातील एक वारसदार असलेले राहुल गांधी जे कॉंग्रेसचे उपाध्यक्ष आहेत , आज त्यांची देश , काँग्रेस आणि राजकारण या स्तरावर एकाकी लढत सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रासह सर्व राज्यात काँग्रेस च्या छत्र छायेखाली बडे बडे नेते आपल्याला कॉंग्रेसची सत्ता असताना दिसून येतात , पण आज कॉंग्रेसची सत्ता नसताना , राहुल गांधी यांची मात्र एकाकी लढत दिसते आहे , गांधी घराण्याचा इतिहास सर्वांना ठावूक आहे पण याचा फायदा घेवून अनेकांनी आपापल्या साठी संधीचा फायदा करवून घेतला, पण आज कॉंग्रेसचे राहुल गांधी वगळता काँग्रेसमधील अन्य कोणी हि नेता सत्ताधारी भाजपा ला किंवा देश हितासाठी फार उत्सुक होवून लढताना दिसत नाही . हेच खरे चित्र आहे . ना देशातील जनता , ना त्यांचे तथाकथित नेते राहुल गांधी यांच्या पाठीशी भक्कम पाने उभी दिसते आहे . तरी ही राहुल गांधी यांनी चालविलेली लढाई मात्र निश्चितच गांधी घराण्याला साजेशी आहे असे मानण्यात येते आहे .