आग्रा- येथील पोलिस कोठडीत मृत्यू पावलेल्या सफाई कामगार अरुण वाल्मिकी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या वाल्मिकी यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आग्र्याला जात असताना आग्रा एक्सप्रेस वेवरील टोल प्लाझावर त्यांना थांबवण्यात आले. लखनऊ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले .१७ दिवसांत दुसऱ्यांदा अटक करणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका यांना अडीच तास ताब्यात ठेवून नंतर भेटीकरता पुढे जाण्यासाठी परवानगी दिली.
शवविच्छेदनात कुटुंबातील एकाही सदस्याचा समावेश नव्हता. शवविच्छेदन अहवाल कुटुंबाला देण्यात आला नाही. ज्यांना लिहिता – वाचता येत नाही अशा एका भावाकडून सही करून घेण्यात आली. अशा काही गोष्टी घडू शकतात याची मला विश्वासही बसत नाही, असं म्हणत या घटनेत पोलिसांच्या कारवाईवर प्रियांका गांधी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
प्रियंका म्हणाल्या की, कोणाच्या मृत्यूनंतर त्यांच्या घरातील कुटुंबीयांना भेटल्याने कायदा सुव्यवस्था कशी बिघडू शकते? तुम्हाला खुश करण्यासाठी, मी लखनऊच्या गेस्ट हाऊसमध्ये आरामात बसून राहू का? असा सवालही प्रियंकांनी केला आहे. पोलिस कोठडीत एखाद्याला मारहाण करून मारुन टाकणे हा कुठला न्याय आहे? प्रियंका म्हणाल्या की मी जिथे जाते तिथे रोखले जाते, मी रेस्टॉरंटमध्ये बसून राहू का.
प्रियंका 17 दिवसांत दुसऱ्यांदा पोलिस कोठडीत
यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी प्रियंका यांना लखीमपूर खेरी हिंसाचारानंतर एका शेतकरी कुटुंबाला भेटण्याचा प्रयत्न करताना ताब्यात घेण्यात आले होते. नंतर पोलिसांनी त्यांना 30 तासांच्या कोठडीनंतर अटक केली. मात्र, 5 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा त्याची सुटका करण्यात आली.
पोलिस म्हणाले – आग्रामध्ये कलम 144 लागू
यावेळी पोलिसांच्या कारवाईवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्याशी बाचाबाची आणि हाणामारी झाली. एडीसीपी सेंट्रल राजेश श्रीवास्तव यांनी लखनौ आणि आग्रामध्ये कलम 144 लागू केल्याचा हवाला दिला. तेथे जाण्याने कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते असे सांगितले.
‘उत्तर प्रदेश सरकारला भीती कशाची आहे? मला का रोखलं जात आहे? आज वाल्मिकी जयंती आहे. पंतप्रधानांनी महात्मा बुद्धावर मोठी भाषणं केली; पण बुद्धाच्या संदेशावर ते हल्ला करत आहेत,’ अशी टीका प्रियांका यांनी सोशल मीडियावरून केली. पोलीस कोठडीत मारहाण करून ठार मारणं हा कुठला न्याय आहे? आग्रा पोलीस कोठडीत अरुण वाल्मिकीच्या मृत्यूची घटना निंदनीय आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं.