सोमय्या म्हणतात – आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय?
मुंबई -भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन नगरविकास खात्यातील काही फाईली तपासल्या. या फाईली तपासत असतानाचा त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यावरून किरीट सोमय्यांवर टीका केली जात आहे. काँग्रेसने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. यानंतर किरीट सोमय्या यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आघाडी सरकारला भीती कशाची वाटतेय? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.याविषयी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, ‘मी कोणत्या कोणत्या फायली तपासल्या याची भीती वाटतेय का? वायकरांची फाईल होती की सरनाईक यांची फाईल होती? किंवा अशोक चव्हाणांची होती? मला वाटते याचीच भीती आघाडी सरकारला आहे. तसेच वेगवेगळ्या स्तरातून माहिती मिळते. घोटाळेबाजांची माहिती मिळते. उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाणांपर्यंतची माहिती आम्हाला असते. मी कुठेही जात, जातो. माहिती गोळा करत असतो आणि घोटाळेबाजांना पाठवतो’असे देखील किरीट सोमय्या म्हणाले.तसेच पुढे बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘माझ्यावर आधीच आघाडी सरकारमधील नेत्यांनी 13 गुन्हे दाखल केलेले आहेत. माझ्यावर माझ्या कुटुंबावर चौकश्या लावल्या आहेत. आता आणखी एक चौकशी होऊन जाऊ दे’ असा टोला देखील किरीट सोमय्या यांनी लगावला होता.