पुणे -”राज्यसभा उमेदवारीसाठी शिवसेना जे नाव सांगेल त्यांनाच आमचा पाठींबा आहे. आता आामच्याकडे जागा शिल्लक नाही. संभाजीराजे असो की आणखी कुणीही असो शिवसेनेलाच आम्ही मत देणार आहोत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.”पुण्यात शरद पवारांनी ब्राह्मण समाजासोबत आज 5 वाजता बैठक घेतली. या बैठकीला वीसपेक्षा अधिक संघटनांची उपस्थिती होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी राज्यसभेच्या उमेदवारीवरुन आपली भूमिका स्पष्ट केली.कुठल्याही जाती-धर्माविरुद्ध बोलु नये यासाठी मी पक्षातील लोकांना समज देणार आहे, अमोल मिटकरींनाही समज दिली.”असे पवार म्हणाले .
पवार म्हणाले, ”साधारणतः वेगवेगळ्या जिल्ह्यातून आजच्या बैठकीला चाळीस लोक आले होते. त्यांच्यात अस्वस्थता होती. माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी विधान केली. त्यानंतर आमची पक्षात चर्चा झाली पुन्हा अशा पद्धतीने कुठल्याही जाती-धर्मावर टीका होणार नाही. जात-धर्मावर कुणी स्टेटमेंट करु नये असे आम्ही सांगितले.
ब्राह्मणांची आरक्षणाची मागणी
दुसरी मागणी अशी होती की, ”समाजातील ग्रामीण भागातील वर्ग नागरी भागात जास्त येत आहे. त्यांना संधी हवीअशीही त्यांची मागणी होती असे पवार म्हणाले. कुणालाही आरक्षण नको अशी त्यांची भूमिका होती. पण मी म्हटलो की ते रद्द करता येणार नाही आरक्षण द्यावेच लागेल.”
महामंडळ स्थापन करा
तिसरा मुद्दा असा होता की, ”विविध समाजाला व्यवसायात मदत करण्यासाठी महामंडळे आहेत. प्रभू परशुरामाच्या नावाने महामंडळ स्थापन करावे अशी त्यांची मागणी होती. मी म्हणालो की, माझ्या हातात हा विषय नाही पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे विनंती करुन बैठकीची तारीख निश्चित करुया. समाजाचे चार ते पाच प्रतिनिधींसोबत बैठक घेऊ ब्राह्मण समाजाच्या सर्व मागण्या मुख्यमंत्री ऐकुन घेतील असेही मी त्यांना सांगितल्याचे पवार म्हणाले. पक्षातून टीका होत असेल आणि त्यातून समज-गैरसमज होत असतील तर जाणकारांनी ते दुर करावे असेही मी त्यांना सुचना केली.”
औरंगजेबाच्या कबरीवर ओवैसी गेले की, कुणी यावर मी काय मत व्यक्त करु. या देशात महागाई, कायदा-सुव्य़वस्था आणि ईतर प्रश्नाला दुर्लक्षित करण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी ज्ञानवापीचा मुद्दा उकरुन काढला असेही ते म्हणाले.
नवाब मलिकांवर जे आरोप होत आहेत ते निराधार आहेत त्यांना मी स्वतः अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचा डी. गॅंगशी संबंध आहे यावर माझा यत्किंचितही विश्वास नाही असेही ते म्हणाले.