नागपूर -राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे अधिवेशन संपेपर्यंत निलंबन केल्याने राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राज्यभर आंदोलन करणार आहे. याचे पडसाद विधानभवनात देखील उमटत असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार घातला आहे. विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन सुरू आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री एकही इंच जागा देणार नाही, असा ठराव करुन मोकळे झाले आहेत. तर महाराष्ट्र सरकार अजूनही गप्प का असा सवाल विरोधी पक्षनेतेअजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जशी त्यांची भूमिका आक्रमकपणे मांडत आहे तशी भूमिका आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री का मांडत नाही असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला आहे.गेली 32 वर्षे भवनाचे सदस्य असणाऱ्या जयंत पाटील यांचे बोलणे सर्वांनी पाहिले आहे. सरकारच्याबद्दल अनेकदा अशी वक्तव्यस केली गेली आहे. मात्र सत्ताधारी सोयीचे वागत आहेत. आम्ही सभागृहात का नाही हे थोड्या वेळात ठरवू असे सांगताना अजित पवार म्हणाले की छगन भुजबळ यांनी केलेले वक्तव्य हे मुंबईचे महापौर, माजगावचे 10 वर्षे आमदार होते. त्यांच्या मुंबईबद्दलच्या वक्तव्यामुळे इवढा मोठा गोंधळ करण्याची गरज नव्हती. देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी हा शब्द मुंबईबद्दल वापरला आहे, प्रवीण दरेकर यांनीही असाच उल्लेख केला होता असेही अजित पवारांनी म्हटले आहे. यांची लोक बोलली की सगळे योग्य आणि आम्ही बोललो तर गोंधळ घालायचे हे चुकीचे असल्याचे पवारांनी म्हटले आहे. महागाई, बेरोजगारी, मराठवाडा आणि विदर्भ यांचा विकास यासवर बोलाण्यासाठी हे अधिवेशन बोलविण्यात आले आहे. मात्र तरीही दिक्षा सालियान, पुजा चव्हाण सारखे मुद्दे काढून दुयऱ्याच मुद्यावर चर्चा सुरू आहे, असे अजित पवारांनी म्हटले आहे.सरकारविरोधात काही सुरू आहे, त्याला बगल देण्यासाठी हे सर्व विषयाला फाटे फोडले जात आहे, असा आरोप अजित पवारांनी केला .
पुढे ते म्हणाले की “छगन भुजबळ यांनी मुंबई सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजतात असं विधान केल्याने इतका गोंधळ घालण्यात आला. पण याआधी विरोधी पक्षनेते म्हणून फडणीसांनी काम पाहिलं तेव्हा मुंबईला सोन्याची कोंबडी अशी उपमा दिली होती. सागर म्हणून आमदार आहेत त्यांनी तशीच उपमा दिली आहे. प्रवीण दरेकरांनीही तसा उल्लेख केला होती. यांची लोकं बोलली की सगळं योग्य आणि विरोधी पक्ष म्हणून आमच्यातील काही सहकारी बोलले की सत्तेच्या, बहुमताच्या जोरावर कामकाज थांबवायचं. मग माफी मागा, दिलगिरी व्यक्त करा अशा वल्गना करणं हे योग्य नाही”.
यावेळी अजित पवारांनी कर्नाटकमधील ठरावाचा मुद्दाही मांडला. ते म्हणाले की “आम्ही मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे ठराव करत असून त्यामुळे बेळगावमधील मराठी माणूस नाराज होत असल्याची माहिती दिली. तिथे महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला जात आहे. तशाच पद्धतीने आपल्याकडे सोमवारी दोन्ही सभागृहात कडक भाषेत ठराव मांडला गेला पाहिजे. आमचं एकमत असल्याने हा ठराव मंजूर करण्यात कोणतीच अडचण नसेल”.
सभागृहात मिळवणारी वागणूक लोकशाहीसाठी मारक आहे. सत्ताधारी पक्षाला मी कधीच वेलमध्ये येताना, कामकाज बंद पाडताना पाहिलेलं नाही. आम्ही ‘सत्यमेव जयते’च्या बाजूने उभे राहत असून, सत्ताधारींची मात्र ‘सत्तामेव जयते’ची बाजू आहे. ती कधीच जिंकणार नाही. आमचा आवाज कितीही दाबला तरी महाराष्ट्र, भूखंड विकू देणार नाही, कर्नाटकला घाबरणार नाही,” असं आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं