नवी दिल्ली- खासदार संजय राउत यांना अटक करण्यात आल्यानंतर समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी राऊतांना अटक झाल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी बोलताना जया बच्चन यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर आरोप केले.‘संजय राऊतांना अटक करण्यात आली त्यात ईडीचा गैरवापर झाला, असे तुम्हाला वाटते का?’ असा प्रश्न जय बच्चन यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना त्या म्हणाल्या की, “हो नक्कीच संजय राऊतांना आमचा पूर्ण पाठिंबा असून त्यांना विनाकारण त्रास दिला जातोय. सध्या ईडीच्या कामाच्या पद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. फक्त 11 लाख रुपयांसाठी तुम्ही अशाप्रकारे एखाद्याला त्रास देत आहात.
2024 पर्यंत असेच चालणार
संजय राऊतांच्या आईबद्दल जया बच्चन यांना विचारण्यात आले असता त्या म्हणाल्या की, राऊत यांची आई खूप म्हातारी आहे. ईडीचा हा अशाप्रकारे सुरू असलेला अवाजवी वापर आणखी किती दिवस चालेल असे तुम्हाला वाटते, असा प्रश्न पत्रकारांने बच्चन यांना विचारला असता त्या म्हणाल्या की, 2024 पर्यंत देशात हे असेच चालणार आहे.