मुंबई-शिवरायांच्या विचारांनी देशाला एकत्र ठेवले. ते अनेकांचे प्रेरणास्थान आहे. परंतु, महापुरुषांचा अवमान सातत्याने होत आहे. देशात सर्वधर्मसमभावांची व्याख्या बदलली आहे का? या देशाचे तुकडे झाल्यास राजकारणी जबाबदार असतील असा इशारा भाजप खासदार उदयनराजे यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ”मी हातात बांगड्या घातल्या नाही आणि मी हतबलही झालो नाही.” उदयनराजे म्हणाले, मी रडणाऱ्यांपैकी नाही. मी लढणारा आहे. आता लढणारच नाही तर दाखवणार आहे. शिवरायांच्या नावाचा वापर राजकारणासाठी होत आहे. चित्रपट, लिखानातून शिवरायांचा अवमान केला जात आहे.
उदयनराजे म्हणाले, राज्यपालांवर कुणीही बोलण्याचे धाडस केले नाही. त्यामुळे मी राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात आवाज उठवण्याचे ठरवले. या आधीच्या पत्रकारपरिषदेत मी रडलो नाही. भावना फक्त अनावर झाल्या होत्या.
अजेंडा काहीही असो पण तुमचा अजेंडा जोपर्यंत छत्रपतींचे विचार सांगतात, तो आचरणात आणा. तो न आणल्यास त्या विचारांचा काय उपयोग? थोडे इतिहासात जाऊ. भारताचे अखंड भाग पाकिस्तान आणि बांग्लादेश होते. त्याआधी शिवरायांचा जन्म झाला पण विचार सोडले की, अखंडता आपण गमावून बसलो. या देशाचे तुकडे करायचे का तर नाही. शिवरायांच्या विचारांनी देशाचे विचार अखंड ठेवले. त्यांच्या विचारांचा विसर पडला तर कसे होईल.उदयनराजे म्हणाले, प्रत्येक राज्याचा प्रमुख काहीही विधाने करीत आहेत. आपण खपवून घेणार आहो का प्रत्येक पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी. काहीही वक्तव्य शिवरायांबद्दल करायचे हे आज नाही आधीपासून सुरू आहे. आपण कोडगे झालो आहोत का? एक तर शिवरायांबद्दल भूमिका स्पष्ट करा अन्यथा नाव घेऊ नका.उदयनराजे म्हणाले, क्षणभर सत्तेत राहण्याला मी महत्व देत नाही. आपली भूमिका राजकीय पक्षांनी स्पष्ट करा आणि सर्वधर्म समभावाचा खुलासा करावा. देशाची फाळणी झाली त्यातून काय मिळाले. शिवरायांच्या विचारांचा विसर पडला तर जबाबदार कोण तर हीच लोक राहील.