मानकर हे लोकसभा निवडणुकीपूर्वीच शहराध्यक्षपदी विराजमान होतील असे चित्र होते. एवढेच नव्हे तर लोकसभा आणि त्यानंतर कोथरूड विधानसभा अशा दोन्ही निवडणुकीसाठी ते निवडून येणारे दमदार नेते म्हणून त्यांचा गवगवा झाला होता .पण काळाची पावले उलटी पडली आणि त्यांना त्यांच्याच कार्यकर्त्याच्या आत्महत्या प्रकरणात गोवले गेले . नुसते गोवले गेले नाही तर चक्क मोक्का लावून त्यांचा या दोन्ही निवडणुकीच्या रिंगना बाहेर ते हताश पणे बघत बाहेर कसे राहतील याचीच जणू बडदास्त कायद्याचा आणि सरकारी यंत्रणेचा गैरवापर करीत ठेवली गेली हे राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सह भाजप सेनेतील कार्यकर्ते आणि नेते मंडळी हि जाणून आहेत .मानकर यांनी या कठीण काळाचा सामना मोठ्या हिकमतीने केला , आता खडतर काल संपला आणि ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. मानकर यांच्यावर अशी वेळ आल्याने त्यांचे सर्वात प्रथम हुकले ते राष्ट्रवादीचे शहराध्यक्षपद .. पण आता ते पद त्यांना पुन्हा देता येईल अशी संधी पक्षाला आणि नेत्यांना प्राप्त झाली आहे. मानकर यांचा शहराच्या राजकारणावर आणि प्रशासनावर असलेला दबदबा ,त्यांच्याकडील युवाशक्ती आणि त्यांचा वैयक्तिक अनुभव या सर्व गोष्टीचा फायदा राष्ट्रवादीला आगामी महापालिका निवडणुकीत निश्चित होईल असे दिसते आहे. या अनुषंगाने आता मानकर यांचे हात बलक्त करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद त्यांना दिले जाईल असे दिसते आहे.
विरोधी पक्षनेता हे पालिकेतील पद राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. चेतन तुपे पाटील यांच्यानंतर ते दिलीप बराटे यांच्याकडे आले. बराटे यांनी आआपला कार्यभार व्यवस्थित सांभाळला आहे ,अन्य पक्षांच्या गटनेत्यांवर सत्ताधारी नेत्यांशी साटेलोटे करणारे नेते म्हणून कधी कधी पाहिले जाते तसा डाग बराटे यांनी कधी स्वतःच्या प्रतिमेला लागू दिला नाही . बराटे यांनी खडकवासला विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी च्या उमेदवाराला मनापासून मदत केली नाही ;केली असती तर तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी झाला असता असा एक आरोप त्यांच्यावर पक्षांतर्गत कुरघोड्या करू पाहणाऱ्या काहीजणांनी विशिष्ट माध्यमांचा आधार घेत केला .पण तो साफ खोटा मानला जातो . तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार अवघ्या २ हजार मतांनी पडला असला तरी तिथे झालेले मतदान स्थानिक आमदाराच्या निष्क्रियतेच्या विरोधात म्हणून झाले होते तिथे उमेदवाराने काही चुकीची माणसे प्रचारकाळात जवळ केली त्याचाच फटका उमेदवाराला बसला अन्यथा किमान १० हजार मतांनी तिथून राष्ट्रवादी चा उमेदवार विजयी झाला असता असा समीक्षकांचा दावा आहे तो आजतागायत ;संबधित चुकीच्या माणसांनी ‘बाहेर येवू दिलेला नाही असे स्पष्ट दिसलेले आहे. त्यामुळे या कारणास्तव पालिकेतील विरोधीपक्षनेता बदलला जाईल असे दिसत नाही . जर कालावधी हेच कारण असेल त्याच कारणाने तर नेता बदलला जाईल पण ज्यांना महापौर पद मिळाले आहे.आमदारकी लढण्याची संधी मिळाली आहे .किंवा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले आहे अशांना आता या पदावर संधी द्यायची काय ? हा प्रश्न विचारला जातो आहे. त्यात महिलेला आता विपक्षनेता करा असा प्रवाह आहे आणि खासदार वंदना चव्हाण त्यास अनुकूल असल्याचे समजते आहे. या दृष्टीने नंदा नारायण लोणकर ,ज्या कधी महापौर पदाच्या शर्यतीत होत्या त्यांचे नाव आता या पदासाठी आघाडीवर आहे. विशाल तांबे , बाबुराव चांदेरे ,दत्ता धनकवडे अशी नावे देखील चर्चेत आहेत . राजकारणात तेही राष्ट्रवादीच्या राजकारणात कधी काय होईल ते सांगता येत नाही . त्यामुळे प्रत्यक्ष घोषणा होईल त्याचवेळेला खरे असे मानणारा वर्ग आता मोठ्या संख्येने दिसतो आहे.