मुंबई : अडीच वर्षांपूर्वी संकटाच्या काळात तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित आले. महाविकास आघाडीच्या सरकारने खूप चांगलं काम केलं. लोकांची सेवा केली. यादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून खूप चांगलं सहकार्य लाभलं.प्रशासनातील अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली. पण माझ्याच लोकांनी मला धोका दिला, याचं दु:ख आहे. काही चुकलं असेल तर माफ करा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कॅबिनेट बैठकीतून एक्झिट घेतली.”संकटाच्या काळात तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्रित आले. महाविकास आघाडीच्या सरकारने खूप चांगलं काम केलं. लोकांची सेवा केली. यादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या लोकांकडून खूप चांगलं सहकार्य लाभलं. अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली. पण माझ्याच लोकांनी मला धोका दिला, याचं दु:ख आहे. काही चुकलं असेल तर माफ करा”