पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित केले. या भाषणात मोदींनी तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली यावर AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी म्हणाले, मोदी सरकारला असे कायदे करण्याचा अधिकार नव्हता. हे फक्त मोदींच्या अहंकाराचे समाधान करण्यासाठी केले गेले, त्यामुळे 700 शेतकरी मरण पावले.मोदींनी अहंकार बाजूला ठेवून राज्यघटनेनुसार काम केले असते तर हा कायदा झाला नसता, ना शेतकरी एवढे मरण पावले असते . हा निर्णय उशिराने घेण्यात आला आहे. मी नेहमीच म्हणत आलो की लोक रस्त्यावर उतरले की हे सरकार घाबरते. हा सर्व शेतकऱ्यांचा विजय आहे.विरोधक पहिल्या दिवसापासून हे तीनही कृषी कायदे असंवैधानिक असल्याचे सांगत आहेत.