नवी दिल्ली- मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं। अशा शब्दात राहुल गांधी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .
प्रियंका गांधी: घाबरलेल्या शक्तीची सारी यंत्रणाच साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या भावाला कधीही भीती वाटली नाही आणि कधीही वाटणार नाही. सत्य बोलत जगलो, सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू.
मल्लिकार्जुन खरगे : भाजपने राहुल यांना अपात्र ठरवण्यासाठी सर्व पद्धती वापरल्या. जे खरे बोलत आहेत ते त्यांना आवडत नाही, पण आम्ही खरे बोलत राहू. आम्ही जेपीसीची मागणी करत राहू, गरज पडल्यास लोकशाही वाचवण्यासाठी तुरुंगातही जाऊ.
जयराम रमेश: आम्ही ही लढाई राजकीय आणि कायदेशीर लढू. आम्हाला शांत करता येत नाही, आम्हाला दडपले जाऊ शकत नाही. पंतप्रधानांच्या अदानी घोटाळ्यावर जेपीसी स्थापन करण्याऐवजी राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केले जात आहे. भारतीय लोकशाही ओम शांती झाली आहे.