मुंबई-राहुल गांधी यांच्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. “घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझा भाऊ कधी घाबरला आणि घाबरणारही नाही… सत्य बोलत आलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे,” असं प्रियंका गांधींनी ट्वीट करत म्हटलं आहे.
तर एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते, असे म्हणत सचिन सावंत यांनी ट्वीटद्वारे पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. तसेच हाच नियम लागू केला तर पंतप्रधान मोदींसह भाजपाचे अनेक नेत्यांना जन्मठेप होईल, असेही ते म्हणाले.
दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी ट्वीट करत हल्लाबोल केला आहे. “घाबरलेलं सरकार साम, दाम, दंड, भेद वापरून राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पण, माझा भाऊ कधी घाबरला आणि घाबरणारही नाही… सत्य बोलत आलो आणि सत्य बोलतच राहणार. देशातील जनतेचा आवाज बुलंद करत राहू… करोडो देशवासीयांचं प्रेम राहुल गांधींच्या पाठीशी आहे,” असं प्रियंका गांधींनी ट्वीट करत म्हटलं आहे.
तर दिल्लीत जयराम रमेश आणि ए एम सिंघवी यांनी पत्रकार परिषद घेऊन , त्यांनी कितीही भीती घातली, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी कॉंग्रेस चा आवाज ते दाबू शकत नाहीत असे म्हटले अआहे.