PM मोदींना पत्रात लिहिले- प्लीज हे थांबवू नका; आज सादर होणार होता अर्थसंकल्प
नवी दिल्ली-दिल्ली विधानसभेत आज अर्थसंकल्प सादर होणार नाही. आम आदमी पक्षाने सोमवारी सायंकाळी एक व्हिडिओ ट्विट केला. ज्यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी असा दावा केला आहे की, केंद्राने दिल्ली सरकारच्या विधानसभेत सादर केल्या जाणार्या अर्थसंकल्पावर बंदी घातली आहे.केजरीवाल म्हणाले की, देशाच्या इतिहासात असे प्रथमच घडले आहे, जेव्हा दिल्लीत अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी केंद्राने त्यावर बंदी घातली आहे. नाराजी व्यक्त करताना CM केजरीवाल म्हणाले की, उद्यापासून दिल्ली सरकारी कर्मचारी, डॉक्टर आणि शिक्षकांचे पगार होणार नाहीत. ही सरळसरळ मोदी सरकारची गुंडगिरी सुरू आहे.
अरविंद केजरीवाल यांच्या या वक्तव्यानंतर नायब राज्यपाल कार्यालयातून एक निवेदन जारी करण्यात आले. ज्यामध्ये एलजी व्हीके सक्सेना यांनी अर्थसंकल्प मंजूर करून काही टिपण्या जोडल्यानंतर 9 मार्च रोजी अरविंद केजरीवाल यांना पाठवले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दिल्ली सरकारने गृह मंत्रालयाला राष्ट्रपतींकडून अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याचा संदेश पाठवला होता. यानंतर, गृह मंत्रालयाने 17 मार्च रोजी आपले निरीक्षण दिल्ली सरकारला कळवले होते. आतापर्यंत ही फाईल दिल्ली सरकारने गृह मंत्रालयाकडे पाठवली नाही. LG ऑफिस अजूनही ही फाईल पाठवण्याची प्रतीक्षा करित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
एलजी कार्यालयातून निवेदन प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी रात्री उशीरा अर्थमंत्री कैलाश गेहलोत यांनी निवेदन जारी केले. ते म्हणाले की, गृह मंत्रालयाने अर्थसंकल्पाबाबत काहीशी चिंता व्यक्त केली होती. 17 मार्च रोजी मुख्य सचिवांना पत्र पाठवून अर्थसंकल्प मंजूर करण्यास नकार दिला होता.
गेहलोत पुढे म्हणाले की, अस्पष्ट कारणांमुळे दिल्लीच्या मुख्य सचिवांनी हे पत्र त्यांच्याजवळ 3 दिवस लपवून ठेवले. हे पत्र मला आज दुपारी 2 वाजता मिळाले. मला ही फाईल सोमवारी सायंकाळी 6 वाजता मिळाली. रात्री 9 वाजेपर्यंत आम्ही गृह मंत्रालयाच्या सर्व चिंतांबाबत एलजी कार्यालयाला आमचे उत्तर पाठवले होते.
दिल्लीच्या अर्थसंकल्पाला विलंब करण्यामागे दिल्लीचे मुख्य सचिव आणि वित्त सचिवांचा हात आहे. त्यांनी हे जाणीवपूर्वक केले आहे. त्यांची चौकशी झाली पाहिजे. यावर एलजी कार्यालयाने उत्तर दिले की, आम्हाला रात्री 9.25 वाजता फाईल मिळाली आणि एलजीच्या मंजुरीनंतर ती सकाळी 10.05 वाजता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवण्यात आली.