“चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल विचारताच तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा…” शरद पवारांचा पत्रकारांना सल्ला
पुणे-अलीकडच्या काळात दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी शाळा आणि शैक्षणिक संस्था यात केलेले भरीव काम पाहण्यास देशभरातून लोक येत आहेत. परंतु याकामात पुढाकार घेणाऱ्यांना केंद्र सरकारने अटक केली. काही लोक भाजपमध्ये गेले की त्यांची चौकशी होत नाही. राज्यात असे अनेक उदाहरणं आहेत. ठाणे,वाशी अकोलामध्ये यापूर्वी कोणाची चौकशी झाली, कोणाला अटक होणार होती, हे सरकारने सांगावे. महविकास आघाडी काळातील कामांबाबत आक्षेप असेल तर त्या कामांचीही चौकशी करा, असे शरद पवार यांनी म्हटले आहे., केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतो आहे याबाबत पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर मी पहिली सही केली आहे असेही ते म्हणाले .“चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल विचारताच तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा…”असा सल्ला शरद पवारांनी पत्रकारांना दिला.
आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते म्हणालेखासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी एकत्रित आगामी निवडणूक लढल्यास लोकसभेला 40 तर विधानसभेला 200 जागा मिळतील, असे मत व्यक्त केले होते. याबाबत शरद पवार म्हणाले, संजय राऊत हे पत्रकार असून त्यांनी अभ्यास केला असेल. मात्र, याबाबत मला अधिक माहिती नाही. लोकांना आता बदल पाहिजे, असे राज्यातील दौऱ्यात मला दिसून येत आहे. महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता आहे. जे त्यात सहभागी नाही त्याबाबत मी बोलणार नाही, असा टोला यावेळी शरद पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना लगावला.शरद पवार म्हणाले, खासदार राहुल गांधी हे देशातील एक राजकीय पक्षाचे प्रमुख नेते आहे. देशातील लोकशाही संदर्भात चिंता करण्याबाबत त्यांनी परदेशात मत व्यक्त केले तर त्याबाबत आक्षेपार्ह काही नाही. महाविकास आघाडी मधील पक्ष आगामी काळात एकत्र राहण्याबाबत आम्ही विचार करत असून त्यात काँग्रेस असणे महत्वाचे आहे. देशातील गावागावात काँग्रेस विचार आणि कार्यकर्ता आहे. त्यांचे यश-अपयश सोडून द्यावे. पण, त्यांचे महत्व कमी नाही.