हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बेचे ‘ मुंबई ‘ केले हे उद्धव ठाकरे विसरले वाटतं..?
आता कुठे गेले मराठी प्रेम ?
मुंबई–
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बॉम्बेचे ‘ मुंबई ‘ केले. याचा उद्धव ठाकरे यांना विसर पडला आहे. आता कुठे गेले मराठी प्रेम ? असा सवाल करत शुक्रवारी मातोश्रीवर झालेल्या उद्धव ठाकरे – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भेटीवरभाजपा मुंबईच्या ट्विटर हँडलवरून टीका करण्यात आली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया देताना मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख केला. नेहमी बेगडी मराठी प्रेम दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांना हे मान्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. उद्धव ठाकरे मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींचे समर्थन करणाऱ्यांसोबत मुख्यमंत्री झाले. आता खलिस्तानवाद्यांचं समर्थन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांला भेटतात. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाहीत अशीही टीका यानिमित्ताने होत आहे.