छत्रपती संभाजीनगर- देशातील सामान्य माणूस राजकारण्यांपेक्षाही शहाणा आहे. १९७५ ते १९७७ या काळात लोकांनी शक्तीशाली इंदिरा गांधीचा पराभव केला. त्यानंतर राजीव गांधींचाही पराभव केला. संसदीय लोकशाही पद्धत दुबळी करणे हे आम्ही मान्य करणार नाही हेच तेव्हाच्या निकालातून लोकांनी सांगितले आणि सत्ताबदल केला असे वक्तव्य करीत लोक काय करू शकतात याची आठवणच राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला करुन दिली.छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, ”आम्हा लोकांचा देशाच्या सामान्य माणसावर विश्वास आहे. आम्ही राजकारणी पण आमच्यापेक्षा देशाचा सामान्य माणूस अधिक शहाणा आहे. आम्ही चुकीच्या रस्तावर गेलो, तर लोक शहापणाने रस्ता दाखवतात १९७७ साली आपण हे पाहिले.”शरद पवार म्हणाले की लोकांनी संसदीय लोकशाही महत्वाची असल्यामुळे ती दुबळी होत चालली हे लक्षात आल्यानंतर प्रचंड शक्तीशाली असलेल्या इंदिरा गांधी यांचा देखील पराभव केला. त्यानंतर ज्याची हाती सत्ता दिली त्यांनी १८ ते १९ महिन्यानंतर देश चालवण्याची जबाबदारी निट पाडली नाही. त्यानंतरच्या काळात मोरारजी भाई तसेच चरणसिंह यांच्यानंतर पुन्हा लोकानीच इंदिरा गांधीच्या हाती लोकांनी सत्ता दिली. लोक शहाणपणाचे निर्णय घेतात.आज देशात काय चित्र आहे. हे सांगताना शरद पवार म्हणाले, केरळ तामिळनाडू, कर्नाटक येथे भाजपची सत्ता नाही. कर्नाटकमध्ये तर सारी शक्ती पणाला लावली तरीही भाजपचा पराभव झाला.शरद पवार म्हणाले की, एकंदर चित्र पाहिले तर अर्थव्यवस्था या गोष्टी पाहिल्या तर शैक्षणीक बाबत मांडणी केली तर मुस्लीम समाजाची संख्या दुर्लक्षीत करण्यासारखी नाही. समाज एकसंघ करायचा असेल तर एखादा घटक मागे ठेवून चालणार नाही. मुस्लीम समाज मागे राहिला हे दिसून येते. काही लोक जाणीवपूर्वक कटुता द्वेषभावना कशी वाढेल असे वागतात. हे देशासमोर मोठे आव्हान असून याची मला चिंता वाटते.