कॉंग्रेसचे उमेदवार पाडणारे पक्षातील गद्दार नेत्यांच्या समवेत मिरवत राहतील तोवर कॉंग्रेसचे खरे नाही -माजी मंत्र्यांनी व्यक्त केली खदखद
पुणे- कॉंग्रेसचा पराभव करण्याची ताकद भाजपात नाहीच, पण तरीही पराभव होत आला त्याला कारण कॉंग्रेस पक्षातील अंतर्गत गद्दारी आणि गद्दारांना नेत्यांकडून मिळणारी ताकद हेच असल्याचे स्पष्ट भाषेत एका माजी मंत्र्यांनी सुनावले आहे. मुंबई टिळक भवन येथे पुणे लोकसभा २०२४ निवडणुकीबाबत बाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली त्यावेळी माजी मंत्री असलेल्या एका नेत्याने पुणे शहरात काँग्रेस पक्षाचे गटबाजी मुळे प्रचंड नुकसान झाले कॅन्टोन्मेंट,शिवाजीनगर विधानसभा संघात १०० टक्के निवडून येणार्या काँग्रेस उमेदवारांचा शहरातील अंतर्गत गटबाजीमुळे थोड्या मतांनी पराभव करवून पक्षाचे फार मोठे नुकसान करण्यात आले, तरीही अशा गद्दारांची दखल नेत्यांनी घेतली नाही अशी पोटतिडकीने खंत प्रदेशाध्यक्ष व प्रदेश वरिष्ठां पुढे मांडली अश्या तऱ्हेने निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गद्दारी व धोका देणाऱ्या व्यक्तींवर पक्षाच्या नियमानुसार कारवाई करावी आणि काँग्रेस पक्षाच्या प्रामाणिक सच्चा कार्यकर्त्याला ताकद द्यावी अशी भूमिका पोटतिडकीने यावेळी मांडली.
एक नेते तर निवडणूक हारण्यासाठीच उमेदवारी मिळवितात कारण त्यातच त्यांचा फायदा दडलेला असतो असाही आरोप यावेळी काही कार्यकर्त्यांनी माध्यम प्रतीनिधी यांच्याशी खाजगीत बोलताना केला.ते म्हणाले ते कायम दिल्ली आणि मुंबईत बड्या बड्या नेत्यांच्या मागे पुढे जी जी करत असतात मात्र त्यांचा पुण्यातील कोणत्याही पालिकेच्या वार्डात देखील प्रभाव नसतो किंवा संपर्क नसतो,जे महापालिकेच्या निवडणुकीला कधी निवडून येऊ शकत नाहीत अशांना बडी बडी पदे देऊन उमेदवारी देखील ते मिळवितात पण हि उमेदवारी त्यांनी जिंकण्यासाठी नाही तर हारण्यासाठी मिळविलेली असते आणि त्यातच त्यांचा मोठा आर्थिक फायदा दडलेला असतो असाही दावा काल टिळक भवनाबाहेर काही मान्यवर कार्यकर्त्यांनी केला होता एक नगरसेवक गेली ३५ वर्षे नगरसेवकच आहेत कधीच त्यांना आमदारकीचे तिकीट दिले गेले नाही,ते निवडून येऊ नये यासाठी राष्ट्रवादीशी सौदेबाजी केली गेली.असाही आरोप केल गेला.
दरम्यान कॉंग्रेसमध्ये निवडून येण्याच्या क्षमतेचे उमेदवार असताना केवळ अशी संधिसाधू आणि पक्षाचे नुकसान करून तुंबडी भरू मंडळीच्या भीतीने क्षमता असतानाही काही जण निवडणूक लढविण्यास कचरत असतात असेही बोलले जाते.
विश्वजित कदम यांच्यावर देखील आता टीका होऊ लागली आहे त्यांनी सुद्धा पुण्यात निवडणूक लढविली तेव्हा मनापासून लढविली नसल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. कदम आता बहुतेक वेळा भाजपच्या नेत्यांसमवेत रमलेले असतात,बहुधा त्यांना भाजपा ची भीती वाटत असावी पण त्यांनी कॉंग्रेस मध्ये राहून भाजपाचे काम करण्यापेक्षा थेट भाजपात जावे असेही कार्यकर्ते बोलू लागले आहेत.निवडणूक समयी झालेल्या राहुल गांधी यांच्या पुणे दौऱ्यात त्यांनी राज्याबाहेरील विद्यार्थ्यांना गांधीच्या समोर बसवून पुण्यात फिरकू दिले नव्हते आणि पुणेकरांशी त्यांचा संबध येणार नाही याची दक्षता घेतली होती असा आरोप त्यांच्यावर केला जातो आहे.
ज्यांच्याबरोबर कार्यकर्त्यांचा मोठ्ठा समूह आहे,त्यांना बाजूला सारणारे एकटे दुकटे असतात, त्यांच्या बरोबर ना कार्यकर्त्यांचा समूह असतो ना जनसंपर्क त्यांचा असतो पण नेत्यांच्या आगे मागे फिरून त्यांनी आपले स्थान बळकट केलेले असते अशा बहुरूप्यांना नेत्यांनी ओळखले पाहिजे असा एकूण सूर आहे.