पुणे-संजय राऊत यांनी कुठल्याही प्रकारची धमकी आलेली नाही, ते काही राज्याचे मोठे नेते नाहीत, ते बदनाम आहेत, सामना चालत नाही म्हणून ब्रेकिंगसाठी ते प्रयत्न करतात. आणि खासदार विनायक राऊत हे सिंधुदुर्गाला लागलेली कीड आहे, अशी खोचक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांवर केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राणे बोलत होते.
नऊ महिन्यामध्ये मुल होतं पण, राज्यात सहा महिने होऊनही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती. त्यावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, “मुल होण्याचे आणि विस्ताराचा प्रोसेस काय आहे ते अजित पवारांचा माहिती आहे, त्यांनी मंत्री असताना स्वत: काय केले त्यांची चौकशी सध्या सुरू आहे, सत्य समोर येईलच.
पुढे शिवसेनेवर टीका करताना राणे म्हणाले की, शिवसेनेवाले आई-वडिलांना विसरले. कसबापेठ आणि पिंपरी चिंचवडची जागा आम्ही मताधिक्याने जिंकणारच आहोत. विरोधकांना आम्ही धुराड्यासारखे उडवणार आहोत” अस म्हणत पिंपरी-चिंचवड आणि कसबापेठ निवडणूक भाजप जिंकणार असा विश्वास राणेंनी यावेळी व्यक्त केला.
मुले जन्माला घातल्यानंतर नाव ठेवण्याचं अधिकार हा बापाला असतो, आम्ही विकास केला त्यामुळे मोदींचे राज्यात दौरे वाढत आहेत, अशी टीकाही यावेळी राणेंनी विरोधकांवर केली.
“पत्रकार शशिकांत वारिसेंच्या हत्याऱ्यांना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोसलं” असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. तर वारिसे यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींसोबत भेटीगाठी होत असल्याचा आरोप करत निलेश राणे यांनी ठाकरे गटावर पलटवार केला आहे. पत्रकार शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणावरून राज्यातील राजकारण सध्या तापू लागले आहे. त्यावरून राजकीय मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे.
कोकणात रिफायनरीच्या बाजूने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा दौरा झाला होता. त्यावेळी रिफायनरीला कोण विरोध करणार हे आम्ही पाहतो अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर 24 तासात या रिफायनरी विरोधात लिहिणारे शशिकांत वारिसे यांची हत्या झाली. त्यांच्या हत्तेमागे सत्ताधारी पक्षातील नेते मंडळी आहे. शशिकांत वारिसे यांच्या हत्तेचा सूत्रधाराला अटक व्हावी. त्याच्या हत्तेला सरकार जबाबदार आहे. सरकारने त्यांचा खून केला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला 50 लाख देण्यात यावे,’ अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी करत दोषींना पकडल्या शिवाय गप्प बसणार नाही, असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर निशाणा साधला आहे.