- नाव : श्री. दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील
- जन्म : 30 ऑक्टोबर, 1956
- जन्म ठिकाण : निरगुडसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे .
- शिक्षण : बी. ए. (ऑनर्स), डी. जे., एल.एल.एम.
- ज्ञात भाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी
- वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती किरण
- अपत्ये : एकूण 1 (एक मुलगी)
- व्यवसाय : शेती व व्यापार
- पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
- मतदारसंघ : 196 – आंबेगाव, जिल्हा पुणे.
- इतर माहिती : महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणात तसेच सहकारी चळवळीमध्ये राज्यातील नेत्यांच्या सानिध्यात राहून सक्रिय सहभाग; संस्थापक – अध्यक्ष, राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र, पुणे, या संस्थेमार्फत ग्रामीण, दुर्गम आदिवासी भागातील जनतेच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले; ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायास प्रोत्साहन देऊन संस्थांचे जाळे विकसित केले व त्याद्वारे सर्वसामान्य जनता विशेषतः ग्रामीण महिला वर्गाच्या आर्थिक सक्षमीकरणाचे कार्य; विश्वस्त . यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व महाराष्ट्रातील अनेक सामाजिक व शैक्षणिक संस्थांशी निकटचा संबंधः संचालक, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक; संस्थापक-चेअरमन, भीमाशंकर सहकारी साखर कारखाना;
1990-95, 1995-99, 1999-2004, 2004-2009,2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; 1992-93 समिती प्रमुख, विधिमंडळ अंदाज समिती सन 1998-99 मध्ये राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र विधान सभेतील “उत्कृष्ट संसदपटू” या पुरस्काराने सन्मानित; ऑक्टोबर 1999 ते डिसेंबर, 2002 उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; डिसेंबर, 2002 ते नोव्हेंबर 2004 ऊर्जा, व उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; नोव्हेंबर 2004 ते मार्च 2005 ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून) व वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री; मार्च 2005 ते डिसेंबर 2008 ऊर्जा (अपारंपरिक ऊर्जा वगळून), वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे मंत्री; डिसेंबर 2008 ते ऑक्टोबर, 2009 वित्त व नियोजन खात्याचे मंत्री; मंत्रीपदी कार्यरत असताना महत्वपूर्ण धोरणात्मक व उल्लेखनीय निर्णय घेतले, त्यामध्ये प्रामुख्याने ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळ’ या कंपनीची स्थापना करून गतीने विकास केला, त्यामुळे राज्यात संगणक साक्षरता वाढीचे महत्त्वाचे कार्य होऊ शकले विद्युत कायदा 2003 ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली; ऊर्जा क्षेत्रात राज्याला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे विभाजन करून सूत्रधारी कंपनी, महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या चार कंपन्यांची स्थापना केली व ऊर्जा विकासासाठी रोडमॅप केला, 6000 मेगावॅटचे प्रकल्प उभारण्याचे व विद्युत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले; 2009-2014 अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा; या काळात विधान मंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले . 2012-13 मध्ये महाराष्ट्र विधान मंडळाच्या अमृत महोत्सव समारंभाचे भारताच्या राष्ट्रपती महामाहिम प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले; तसेच यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रदर्शन व चर्चा सत्रांचे आयोजन ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.