मुंबई:एअरबस सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प महाराष्ट्राऐवजी बडोद्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑक्टोबर रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहे. यावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी थेट “महाराष्ट्रच गुजरातमध्ये विलीन करा अशी खोचक टीका केली आहे. आनंद दवे म्हणाले, एक नंबरवरील महाराष्ट्र 5व्या नंबरवर चालला आहे. मात्र सगळे राजकारण करण्यातच दंग आहेत. त्यामुळे बाकरवडी आणि ढोकळा एकत्र करा असही दवे म्हणाले
सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा मेगा प्रकल्प महाराष्ट्रातून आधीच गुजरातमध्ये गेला आहे. त्यानंतर आता एअरबस हा प्रकल्प देखील गुजरातमध्ये गेला आहे.तब्बल २२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प होता. यावरून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका होत आहे. त्यातच आता ब्राह्मण महासंघाने जोरदार टीका केली आहे. वास्तविक पाहता, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिनाभरापूर्वीच म्हटलं होतं की, एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे. टाटाच्या कोलॅब्रेशनसोबत हा प्रकल्प येणार आहे. मात्र तरी हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
.