राजकारणात जन्म दिलेल्या आईला गिळायला निघालेली ही औलाद आहे
हिंदुद्वेषी घरातच आहेत ते कपाळ करंटे आहेत. हा पालापाचोळा आज उडत आहे जी पानं गळणे गरजेची आहेत ती गळत आहेत. पानगळ होते तेव्हा आपल्याला वाटते की झाडाला काय झाले पण आठ दहा दिवसानंतर झाड हिरवेगार होते. झाडाकडून सर्व काही मिळाल्यानंतर पानं टवटवीत झाले आणि गळुन पडत आहेत. अशा घणाघात भाजप आणि शिंदे गटावर शिवसेना प्रमूख उद्धव ठाकरे यांनी केला.सामनाला दिलेल्या मुलाखतीत ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यांची तडाखेबंद मुलाखत सामनाचे संपादक आणि शिवसेना नते तथा खासदार संजय राऊत यांनी घेतली त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, आता शिवसेनेच्या झाडाला नवीन कोंब फुटत आहेत. ज्येष्ठ शिवसैनिक येऊन भेटतात. त्यांना संघर्ष काय हे कळलेले आहेत. ते आशिर्वाद देत आहेत.मी म्हटले मातोश्रीवर जायचेयठाकरे म्हणाले, जेव्हा माझी शस्त्रक्रीया झाली. तेव्हा मला सुटी देताना डाॅक्टर म्हणाले की, सर कुठे जायचे मातोश्री की वर्षा मी म्हटलो मातोश्री..मुख्यमंत्रीपद महाराष्ट्रासाठी वैभवशाही पण मला त्याचा मोह नव्हता.मी गुंगीत असताना काहींची हालचाल वाढली.ठाकरे म्हणाले, मी गुंगीत असताना माझे सरकार पाडले जात होते. तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रिया कुठल्याही डाॅक्टरांना विचारल्यानंतर मानेचे धोके गंभीर असतात. अचानक पाच सहा दिवसानंतर सकाळी जाग आली, आळस देताना मानेची हालचाल बंद झाली. तो गोल्डन अवर होता त्यातच माझे ऑपरेशन झाले म्हणून आज मी तुमच्यासमोर उभा आहे. मी बरा व्हावा म्हणून काहीजण देवाची पूजा करीत होते तर मी असाच राहावा म्हणून काहीजण वाईट चिंतीत होते ती गोष्ट माझ्यासाठी आयुष्यभर आठवणीत होती. जेव्हा माझी हालचाल बंद होत होती तेव्हा काही जणांची हालचाल वाढत होती.सत्ता मेव जयते भाजप, शिंदेंचे ब्रीद बाळासाहेबांचे नाव भाजप आणि शिंदे गट घेत आहेत. त्यांचे नाव पुढे करुन ते समाजात सम्रंभ करीत आहेत. मला देशाच्या घटनेवर विश्वास आहे. चोरी मारी सर्वत्र चालते पण मी सत्यमेव जयते मानतो. आज सत्ता मेव जयते हा शिंदे आणि भाजपचे ब्रीद आहेत.ठाकरे म्हणाले, ज्यांना मी अधिकार दिले होते. त्या शिंदे यांनीच धोका दिला. माझ्याकडे साधी खाती ठेवली होती. आयटी माझ्याकडे ठेवले होते तंत्रज्ञानामुळे समाजाचा कसा फायदा होईल यासाठी ते ठेवले होते.ठाकरे म्हणाले, चुक माझी आहे. गुन्हा माझा आहे की मी शिंदे यांना परिवारातील समजलो. समजा मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केले असते तर त्यांनी वेगळे काय केले असते त्यांची राक्षसी महत्वकांक्षा आहे. त्यांना अजून काय हवे आहे. ते स्वतःला बाळासाहेब मानत आहेत.ठाकरे म्हणाले, मविआचा प्रयोग चुकला असता तर जनतेने उठाव केला असता पण तसे झाले नाही. सत्ता येताच आम्ही जनतेची कामे केली, निर्णय घेतले. पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांत माझे नाव घेतले जात आहे ते जनतेमुळेच घेतले जात आहे. कोरोनाकाळात परिस्थिती तशी होती आणि लोक ऐकत होते. मी बाहेर पडलो असतो तर लोकांना सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण असे झाले असते.उद्धव ठाकरे म्हणाले, ते मंत्री झाले तरीही त्यांच्या कपाळावरचा विश्वासघाताचा शिक्का कसा पुसणार आहेत. सामान्यांना बाळासाहेबांनी असामान्य पद दिली, आता माझी वेळ आहे. सामान्यांना असामान्य मी शिवसैनिकांना बनवणार आहे. ज्या आईने जन्म दिला त्या आईला अर्थात शिवसेनेला गिळायला बंडखोर निघाले आहेत.ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र खूप सुंदर आहे, पण ग्रामीण आमदारांना गुवाहाटीची भुरळ पडते राज्याची नव्हे हे वाईट आहे. केंद्रीय तपास यंत्रणा गैरवापर ते करीत आहेत, पण त्यातून काय साधणार आहे.बाळासाहेब ठाकरे हृयात असताना नारायण राणे, छगन भुजबळ यांच्यासारखे मोठे नेते शिवसेना सोडून गेले. त्यांच्यासोबत काही आमदारही गेले. मात्र शिवसेनेत उभी फूट कधीच पडली नव्हती. मग यावेळीच असं का घडलं, असा प्रश्न संजय राऊत यांनी ठाकरेंना विचारला. त्यावर मी ज्यांना अधिकार दिले होते, त्यांनीच माझा विश्वासघात केला, असं उत्तर ठाकरेंनी दिलं.
मी मुख्यमंत्री झाल्यावर लोक माझ्या तोंडावर बोलत नव्हते. पण मला कुजबूज ऐकू यायची की, काय हे मुख्यमंत्री आहेत.. नगरविकास खातं मुख्यमंत्र्यांकडे असायला हवं. मलईदार खातं आहे म्हणतात. पण मी ते खातं माझ्याकडे न ठेवता विश्वासानं त्यांच्याकडे सोपवलं होतं. मी मलई बिलई खाण्यासाठी गेलो नव्हतो. मी माझ्याकडे जी खाती ठेवली होती ती एक म्हणजे सामान्य प्रशासन, दुसरे न्याय व विधी. आयटीही ठेवलं होतं. कारण खरंच या तंत्रज्ञानाचा उपयोग सगळ्या खात्यांसाठी काहीतरी करता येईल का, हा माझा विचार होता, असं ठाकरेंनी सांगितलं.
महाराष्ट्र किती सुंदर आहे. ग्रामीण भागातील आमदारांना महाराष्ट्राच्या या निसर्गाची भुरळ पडत नाही आणि गुवाहाटीच्या निसर्गाची भुरळ पडते. पण मला एक कळलंच नाही मग तुम्ही महाराष्ट्राच्या मातीत जन्माला तरी कसे आलात?असा खोचक सवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांना विचारला आहे. ज्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलात त्या मातीची तुम्हाला ओढ नाही. प्रेम नाही. त्या मातीचं वैभव दिसलं नाही असा टोला ठाकरेंनी लगावला.उद्धव ठाकरे म्हणाले की, मी स्वत: कलाकार आहे. त्याच्यावरूनही त्यावेळी चेष्टा झाली होती. पण मी गडकिल्ल्यांची फोटोग्राफी केली आहे. पंढरपूरच्या वारीची केली आहे. त्यावेळी मी जो महाराष्ट्र बघितला. त्यावेळी पावसाच्या सुमारास ही फोटोग्राफी केली. इतका नटलेला, थटलेला महाराष्ट्र, दऱ्याखोऱ्या छान फुलांची बहरून जातात. मी तर शहरी बाबू. तुम्ही तर ग्रामीण भागातले. त्या ग्रामीण भागात राहून तुम्हाला महाराष्ट्राचं सौदर्यं दिसलं नाही. त्याचं वर्णन करावंसं कधी वाटलं नाही आणि डायरेक्ट गुवाहाटी? मी गुवाहाटीला वाईट म्हणत नाही. प्रत्येक प्रदेश चांगलाच असतो पण हे काय आपल्या मातीसाठी करणार? असा सवाल त्यांनी केला.तसेच विरोधी पक्ष हासुद्धा तेवढाच सुसंस्कृत पाहिजे. संवेदनशील पाहिजे आणि तेवढाच किंबहुना त्यापेक्षा जास्त सत्ताधारी पक्ष हा संवेदनशील आणि सुसंस्कृत असला पाहिजे. आता संवेदनशीलता आणि सुसंस्कृतापणा हा कुठेतरी रसातळाला जायला लागला आहे. पिढ्या बदलताहेत आणि सत्तेची हाव आता झालंय. फास्ट फूडचा जमाना आला आहे. तुम्ही फोन केलात की दहा मिनिटांत, पंधरा मिनिटांत, वीस मिनिटांत पार्सल आलंच पाहिजे. तसं मी पक्षात गेलो की, थोड्या दिवसांत मला काहीतरी मिळालंच पाहिजे. नाही दिलं तर माझ्याकडे दुसरा तयार आहेच असा टोलाही शिंदे गटातील आमदारांना लगावला आहे.मानेतील क्रॅम्पनंतर काय-काय घडलं
”सरकार गेले, मुख्यमंत्रीपद गेले याची खंत नाही. पण माझीच माणसे दगाबाज निघाली. मी रुग्णालयात शस्त्रक्रियेनंतर गुंगीत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले. “त्या काळात माझ्या कानावर येत होतं की, काहीजण मी बरा व्हावा म्हणून देवावर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. ते देव पाण्यात बुडवून बसलेले लोक आता पक्ष बुडवायला निघाले आहेत आणि तेव्हा पसरवलं जात होतं की, हे आता काही उभे राहात नाहीत. आता आपले काय होणार? तुझं काय होणार? ही चिंता त्यांना होती. ज्या काळात आपल्याला पक्षाला सावरण्याची वेळ होती,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.