मुंबई- आता काही मिनिटापूर्वी शिवसेनेचे खासदार ,नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना अगदी निर्वाणीचा इशारा दिला आहे, चर्चेतून मार्ग निघू शकतो .घरचे दरवाजे उघडे आहेत .. का उगाच वणवण भटकताय ? असा सवाल करत गुलामी पत्करण्यापेक्षा स्वाभिमानाने निर्णय घेऊ असे आवाहन केले आहे .
एकनाथ शिंदेंनी वेगळा गट केला तरी ते स्वतः मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत हे स्पष्ट आहे , आणि आता हि त्यांच्याकडे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या अनेकांकडे मंत्रिपदे देखील आहेत . शेवटी भाजपाला पाठींबा देऊन सरकारमध्ये सामील झालात तरी उरलीत २ वर्षे .. त्यात हेच भाजपावाले तुम्हाला काय देणार .. किती कामे करू देणार .. स्वतः काय करणार ? शेवटी तिथे तुम्हाला नंतर हाजी हाजी करायची आहेच ,आणि उमेदवारीलाही मागे पुढे धावायचे आहेच … अशा आशयाने हे ट्वीट राउत यांनी केले असावे असे सूत्रांचे म्हणणे आहे .जर आघाडीत अजितदादांच्या बद्दल गाऱ्हाणी असतील तर ती अजित पवारांपुढे न मांडता थेट शरद पवारांपुढे मांडता येतील असेही सूत्रांचे म्हणणे आहे . आणि शरद पवार हे अजित पावरांविरोधातील गाऱ्हाणी गांभीर्याने घेतील आणि दादांना देखील त्याची खास दक्षता घ्यावी लागेल असे सूत्रांचे म्हणणे आहे. या अनुषंगानेच राऊत यांनी हे ट्वीट केले असावे जेणेकरून बंडखोर माघारी येतील आणि हा तिढा सुटू शकेल असे काहींना वाटते आहे.