…मी साखर कारखाने विकत घेतले माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी घोडचुक
…64 कारखाने ३ ते ५ कोटीत विकले…त्याबद्दल का कोणी बोलत नाही
पुणे :साखर कारखान्याबाबत वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करूनही काही निष्पन्न झालेले नाही. 25 हजार कोटींचा भ्रष्टाचार हा आरोप खोटा आहे. साखर कारखान्यांबाबतीत खोटी आकडेवारी सादर करून आरोप केले जात असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले.यावेळी त्यांनी ६४ कारखाने आणि १ सूतगिरणी अशा ६५ नावांची यादी जाहीर केली . कारखान्यांना लागतात किती रुपये आणि काही कारखाने ३ ते ५ कोटींना कसे विकले गेले ? याचा शोध वेळ असलेल्या पत्रकारांनी कनवा अन्य कोणी का घेतला नाही ? असा सवाल हि त्यांनी केला
अजित पवार पुढे म्हणाले, भ्रष्टाचार झाल्याचा आरोप खोटा असून वेगवेगळ्या यंत्रणांनी चौकशी करून काहीही उपयोग नाही. तसेच सध्या खोटी आकडेवारी दाखवून आरोप केले जात आहेत. गेल्या पंधरा वर्षात 64 सहकारी साखर कारखाने विकले किंवा चालवायला दिले. त्यातील काही कारखाने फडणवीस सरकारच्या काळातदेखील विकण्यात आलेत. दोन-चार कोटी रूपयांना देखील कारखान्यांची विक्री झाली आहे. या साऱ्या कारखान्यांची यादी मी तुम्हाला दिलीय.कारखाने कुणी-कुणी घेतले त्याचा शोध आता तुम्हीच घ्या, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला.जरेंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची विक्री ही पूर्णपणे कायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्य बँकेने त्या कारखान्याची विक्री केली आहे. यात कोणताही घोटाळा किंवा नियमबाह्य काहीही झालेले नाही. केवळ बदनामी करण्यात येत आहे, असे पवार यांनी स्पष्ट कले.पवार यांनी पत्रकार परिषदेत 64कारखान्यांची यादीच वाचून दाखवत कोणता कारखाना किती रकमेला विकला गेला ती आकेवारी वाचून दाखविली. जरंडेश्वरच्या व्यवहारात कोणताही गैरप्रकार झाला नाही. सारेकाही नियमानुसार झाले असताना केवळ बदनामी करण्यात येत आहे. सध्या चौकशी सुरू आहे. त्यातून सत्य बाहेर येईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.64 कारखान्यांची यादी वाचून दाखवताता त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्याचे नाव घेतले नाही. ज्या कंपनीने संबंधित कारखाना विकत घेतला त्या कंपनीची नावे वाचून दाखविली या कंपन्यांच्या नावावरून तुम्हाला मालकांचा शोध लागेल, असे त्यांनी सांगितले. ज्यांनी आरोप करून बदनामी केली त्यांच्याबद्दल मला काहीही म्हणायचे नाही.त्यांच्याविरोधात न्यायालयातही जाणार नाही. असले उद्योग मी करीत नाही. मला भरपूर कामे आहेत, असे सांगत पवार यांनी अन्य विरोधी नेत्यांचा नामोल्लेख टाळला .पुणे मेट्रोसाठी ‘नागपूर पॅटर्न’ राबवणार: पुढे बोलताना पवार म्हणाले, दिवाळीनंतर 100 टक्के क्षमतेने थिअटर सुरू करण्याचा विचार आहे. तसेच गेल्या 9 दिवसांत लसीकरणात वाढ झाली आहे. राज्यात 10 कोटींपेक्षा जास्त लसीकरण झाले आहे. लस घेऊनही 60 वर्षांवरील नागरिकांमध्ये कोरोनाची लागण होत असल्याचे आढळले. पुणे मेट्रोसाठी ‘नागपूर पॅटर्न’ राबविला जाणार. पुणे मेट्रोसाठी उभारण्यात येणाऱ्या पुलाचे काम दिवाळीच्या आसपास सुरू होईल असे पवार यांनी सांगितले.नवाब मलिक प्रकरणात अजित पवारांचे नो कमेंटनवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली, त्यांच्या कुटुंबियांना बोगस म्हटले त्यावर विचारले असता उत्तर देण्याचे अजित पवारांनी टाळले. नो कमेंट, म्हणत मला यावर बोलायचं की नाही हे ठरवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हंटल