मुंबई- न्यायासाठी होणारा विलंब न्याय टाळण्यास कारणीभूत होणार नाही याची दक्षता घेणे जरीरीचे आहे असे विशद करताना आज सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाकडून हे अपेक्षित नाही सांगत त्यांनी नाराजी जाहीर केली आहे.अरविंद सावंत म्हणाले की, “डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं आहे त्याच्या मुळावर घाव घालण्याचं जे काम सुरु आहे त्याची जास्त चिंता वाटत आहे16 आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, देशाच्या घटनेच्या मुळावर जे घाव घालण्याचे काम सध्या सुरू आहे, त्यांची सर्वाधिक चिंता वाटते आहे. हीच चिंता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी देखील व्यक्त केली होती, असे सांगताना त्यांनी कुणी याबाबत का बोलत नाही याचे आश्चर्य वाटते असे म्हटले आहे.संविधानाच्या परिषिष्ठ 10 मध्ये अधिकार होता की पक्षांतर बंदीच्या 1 – तृतिअंश गटाला मान्यता होती. 2 – तृतिअंश आमदार बाहेर पडू शकतात मात्र त्यांना वेगळा गट स्थापन होऊ शकत नाही. बेकायदेशीर सरकारला सरंक्षण दिले जात आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला धक्का दिला होता. तिथे भाजपच्या मदतीने काँग्रेसच्या बंडखोरांचा शपथविधी घेतला होता. मात्र त्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय देत तिथे काँग्रेसची सत्ता परत स्थापन करण्याचा निर्णय दिला होता. असाच निर्णय महाराष्ट्राला लागू होतो.
शिवसेनेचे कोणतेही खासदार नाराज नाही असे शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी नावे जाहीर करावी, आम्हालाही कळेल कोण 14 खासदार आहेत, ज्यांची ईच्छा आहे. आमचे कोणतेही खासदार नाराज नाही, मात्र प्रत्येकाने पक्षप्रमुखांशी चर्चा करावी, आपली मते मांडावी असे हसत खेळत बैठका शिवसेनेत होत असतात असे मत अरविंद सावंत यांनी व्यक्त केले आहे.आमच्याकडे मते मांडण्याचा अधिकार आहे, पक्ष प्रमुख तु असे का बोलला आम्हाला विचारत नाही, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा मात्र पक्ष प्रमुखांचा असतो असेही सांगायला ते विसरले नाहीत. शिवसेनेची ही पद्धत समजून घेतली पाहीजे आणि त्यावर काम सुरू आहे, असेही सावंत यांनी सांगितले.
.