मुंबई. संकटाच्या काळातही यांना इव्हेंट करायचे आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पीएम नरेंद्र मोदींच्या शुक्रवारच्या जनसंदेशावर संताप व्यक्त केला. देशात सर्वत्र कोरोनाची भीती पसरली असताना मोदींनी काय बोलणे अपेक्षित होते आणि मोदी काय बोलत आहेत अशी टीका करताना जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले. त्यामध्ये नागिन या जुन्या हिंदी चित्रपटाचा फोटो देत त्यांनी कॅप्शनमध्ये मोदींवर संताप व्यक्त केला. देशाला इतकेही मूर्खात काढू नका असे आव्हाड म्हणाले आहेत.जितेंद्र आव्हाड ट्विट करून म्हणाले, “भारताने कोरोनाविरुद्धची लस शोधली,एकालाही मास्क कमी पडू देणार नाही. डॉक्टरांच्या मागे आम्ही उभे आहोत. कुठलाही गरीब उपाशी झोपणार नाही. असे भाषण मोदींकडून अपेक्षित होते. तर त्यांनी या संकटाचाही इव्हेंट करायचं ठरवलं. म्हणे… अंधार करा आणि बॅटरी पेटवा. देशाला इतकेही मुर्खात काढू नका.”
नेमके आव्हाड यांनी काय म्हटले आहे हे त्यांच्याच शब्दात ऐका ….