नवी दिल्ली- महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत. त्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी. अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी सोमवारी लोकसभेत केली. कामकाजाच्या शून्य प्रहरात महाराष्ट्रातील काही खासदारांनी राज्यातील ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला. त्यामध्ये सहभागी होताना बापट म्हणाले की या महाराष्ट्रामध्ये आज पर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते .परंतु आता सरकार खंडणी मागायला लागले आहे. म्हणजे आता कुंपणच शेत खायला लागले आहे. पाण्याला तहान लागली आहे आणि सरकार भ्रष्ट होत चालले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करा आणि या गुन्हेगारांना आतमध्ये टाका ही आमची सभागृहात मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाहीह कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले आहेत. कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बुडाली आहे .पोलीस खंडणी मागायला लागले आहेत. त्या पोलिसांना मंत्र्यांचा आशीर्वाद आहे. मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. म्हणून आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी करीत आहोत.