पुणे- रेमडिसिवीरच्या अपुरवठ्यामुळे महाराष्ट्रात माणसं मृत्यूमुखी पडत असताना रेमडिसिवीर च्या साठेबाजी ला कोणीही प्रोत्साहन देऊ शकत नाही रात्री १२ वाजता पोलीस आधिकाऱ्यांना भेटून देवेंद्र फडणवीस तसे प्रवीण दरेकर आणि अन्य भाजपा नेत्यांनी जी दखल अंदाजी केली तीच सामान्य माणसाने केली असती तर त्यास तुरुंगात डांबले असते . मग या भाजपा नेत्यांना वेगळा कायदा का ? कशासाठी ? यांच्यावर सरकारी कामात अडथला आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी आप च्या मुंबईतील नेत्या प्रीती मेनन यांनी केली आहे.
प्रीती मेनन यांनी याप्रकरणी म्हटले आहे कि,’ माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे की भाजपा नेते हे भाजपच्या वतीने दमणला जाऊन येऊन ब्रुक फार्म यांना भेटून आले. भाजपा ने ब्रुक फार्म यांच्याकडून रेमडिसिवीर चे स्टॉक आणले.
राजकीय पक्ष हे इलेक्शन कमिशन ला रजिस्टर असतात, चॅरिटी कमिशनला नाही ! कोणत्याही प्रकारच्या डोनेशनसाठी एखाद्या पक्षाने ड्रग्ज, औषधं विकत घेणं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे.
डोनेशनच्या नावाखाली नागरिकांना अत्यंत सहज पद्धतीने फसविता येतं. म्हणून आपल्या संविधानात आणि प्रतिनिधीक नागरिक कायदा १९५१ यांत हे स्पष्टपणे नमूद केलं आहे की राजकीय पक्ष चॅरिटी करू शकत नाही.देवेंद्र फडणवीसांनी हे उघडपणे म्हटलं की भाजपा ने रेमडिसिवीर हे औषध चॅरिटी साठी खरेदी केलं. आणि म्हणूनच त्यांच्यावर, भाजपावर आणि त्यांच्या कार्यालयीन सदस्यांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात द्यायलाच हवेत.
दुसरं म्हणजे ज्या प्रकारचं अत्यंत हीन दर्जाचं राजकारण राज्य सरकारविरूद्ध करतयं ते पाहता इतक्या मोठ्या प्रमाणात रेमडिसिवीरची खरेदी करणं याचा हेतू नागरिकांना मदत करण्याचा नसून त्याची साठेबाजी करण्याचाच असावा.अशा प्रकारचं कृत्य हे एखाद्याचं जीव घेण्यासारखं आहे. आणि म्हणूनच आप मागणी करतं की मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी.प्रत्येक टी.व्ही. चॅनेल देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपा नेते पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी कशी धरून लावत आहेत हे अगदी भयानकरित्या दाखवत होते. अशा प्रकारचं कृत्य एखाद्या सामान्य माणसाने केलं असतं तर त्याला आयपीसी सेक्शन ३५३ च्या आधाराखाली तुरुंगात डांबलं असतं.
“सामान्य नागरिकांना पोलिसांकडून उर्मट वागणूक मिळत असताना भाजपा नेत्यांना मात्र खास वागणूक का दिली गेली? यावर्षीच्या सुरूवातीला मी डीसीपी उपाध्याय यांच्याशी भेटण्याचा. प्रयत्न केला. त्यांनी मला वाट पहायला सांगितले. आणि नंतर त्यांच्या कार्यालयाद्वारे मला माझा फोन बाहेर ठेवून त्यांना. भेटण्यासाठी सांगण्यात आले. जेव्हा मी हे करण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी मला त्यांच्या कार्यालयात यायला परवानगी दिली नाही. मी या संदर्भात कमिशनरनाही तक्रार केली पण कोणताही पाऊलं या संदर्भात उचलली गेली नाहीत.पण इथे तर भाजपा नेते खाजगी मिटींग सुद्धा फोनमध्ये रेकॉर्ड करत असल्याचं दिसून येतं !याचा अर्थ मुंबई पोलीस प्रत्येक नागरिकांना समान पद्धतीने वागणूक देत नाही ?”
भाजपा ने रेमडिसिवीरच्या केलेल्या साठ्यासंदर्भात आणि कायदा तोडून बेकायदेशीर चॅरिटी करण्याचे प्रयत्न केल्याच्या संदर्भात आप मुंबई टीम.ही मागणी करतं की भाजपा विरोधात लवकरात लवकर कारवाई करण्यात. यावी.असे मेनन यांनी म्हटले आहे.