पुणे- १२ आमदारांच्या निवड प्रक्रियेवर कित्येक महिने निर्णय प्रलंबित ठेवणारे महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आता महाराष्ट्रातील पहिले सर्वपरिचित झालेले पहिले राज्यपाल असतील , त्यांचे नाव महाराष्ट्रातील राजकारणातच काय ,जनतेत देखील दीर्घ काल स्मरणात राहील,सर्वाधिक कार्यक्रम घेतलेले ते बहुधा पहिलेच राज्यपाल असावेत या सर्वामागे कारणेही तशीच होती ती म्हणजे त्यांच्यावर बसलेला भाजपाचा शिक्का ..
आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणात याच राज्यापालानी मोठा निर्णय घेतला आहे ,दिल्लीहून परतलेल्या देवेंद्र फडणविसांनी रात्री राज्यपालांना पत्र दिले सरकारच्या बहुमताची चाचणी घ्या ,वास्तविक पाहता १६ आमदारांच्या निलंबन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ११ जुलाई पर्यंत स्थगिती दिलेली असताना त्याचा विचार न करता राज्यपालांनी सरकारला उद्याच अधिवेशन बोलावून बहुमताची चाचणी घ्या असे आदेश दिले आहेत .यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक विश्वंभर चौधरी यांनी आपले मात्प्रदाष्ण केले आहे काय म्हटले आहे त्यांनी ते स्त्यांच्याच शब्दात वाचा ….
सर्वोच्च न्यायालयानं राज्यपालांना तीन प्रश्न विचारले पाहिजेत:
1. सभागृहाचं कामकाज तहकूब करू नका हे तुम्ही कोणत्या अधिकारात सांगता?
2. संध्याकाळी पाच वाजता अधिवेशन संपवा हे तुम्ही कोणत्या अधिकारात सांगता?
3. अधिवेशन बोलवतांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला घेणं तुम्हाला बंधनकारक आहे, तो तुम्ही घेतला आहे का?
या तिन्ही गंभीर बाबी आहेत. राज्यपालांचा आदेशच बेकायदा आहे.
(डॉ. विश्वंभर चौधरी)