नवी दिल्ली -ज्या इंदिरा गांधींना काश्मीर मागितला तर त्यांनी पाकीस्तानशी युध्द पुकारत बांगलादेशाची स्वतंत्र निर्मिती केली . कोणी खलीस्थान मागितला तर थेट रक्तरंजित धडाकेबाज कारवाई केली .. आणि नंतर स्वतः शहीद झाल्या. ज्या राजीव गांधींची देखील याच देशात हत्या झाली . अशा इंदिरा- राजीव -गांधींच्या घराण्यातील राजकुमाराची अवस्था आज मोठी बिकट झाली आहे . सर्वच जवानांच्या मागणीसाठी ,आत्महत्या केलेल्या एका जवानाच्या, पित्याच्या , भावाच्या सन्मानासाठी थेट पोलीस ठाण्यात त्यांना सामान्य माणसाप्रमाणे डांबून ठेवले जात आहे . आणि पोलिसांशी ही हुज्जत घालावी लागत आहे . … एवढेच नव्हे तर खुद्द राहुल गांधींचे कट्टर विरोधक अरविंद केजरीवाल जे दिल्लीचे मुख्यमंत्री असून ही त्यांना हि पोलीस ताब्यात घेवून बसवून ठेवत आहेत .
दरम्यान आज रामकिशन गरेवाल यांच्यावर भिवनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्काराला काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी उपस्थिती लावली.
माजी सैनिक रामकिशन ग्रेवाल यांच्या आत्महत्येनंतर दिल्ली मध्ये सकाळपासून सुरू झालेलं हे महाभारत अजुनही सुरूच आहे. माजी सैनिकांना मिळणाऱ्या अपुऱ्या पेन्शनमुळं रामकिशन ग्रेवाल यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होतो आहे. या मुद्द्यावरून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले आहेत तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी देखील मोदी सरकारवर जोरदार हल्ला बोल केला आहे. दिवसभरात दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींना दोनदा ताब्यात घेतलं होतं. मात्र, नंतर त्यांची सुटका करण्यात आली. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही लेडी हार्डिंग रुग्णालयाबाहेरून ताब्यात घेण्यात आलं आहे.त्यापूर्वी सकाळी आपचे नेते मनिष सिसोदीयांना देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडलं. दरम्यान, आत्महत्या केलेल्या ग्रेवाल यांच्या नातेवाईकांना अटक केल्यानंतर राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांनी सरकारवर जोरदार टीका केली.
(हा पहा अल्पसा व्हिडीओ)