सर्वांना माहिती आहे,माझ्या विरोधात खोटे कागदपत्रं, खोटे पुरावे..पण मी झुकणार नाही…
मुंबई- मी बाळासाहेब ठाकरेंचा आणि उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी लढणार, आम्ही लढू, महाराष्ट्र इतका कमजोर नाही, शिवसेना कमजोर नाही, असं संजय राऊत म्हणाले. शिंदे गटात सामील झालेल्या संजय शिरसाट यांच्या टीकेवर संजय राऊत यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटाला फटकारलं आहे.खरी शिवसेना काय आहे ते पाहता आहेत. माझ्या विरोधात खोटे कागदपत्रं, खोटे पुरावे लोकांना मारपीट करुन तयार करण्यात येत आहेत. महाराष्ट्राला कमजोर करण्यासाठी, शिवसेनेला कमजोर करण्यासाठी करण्यात येत आहे. महाराष्ट्र कमजोर होणार नाही, शिवसेना कमजोर नाही, संजय राऊत झुकणार नाही. महाराष्ट्र कमजोर होतोय, पेढे वाटा, महाराष्ट्रावर हल्ले करण्यात येत आहेत, पेढे वाटा, बेशरम लोक आहात तुम्ही पेढे वाटा, अशा शब्दात संजय राऊत यांनी फटकारलं आहे .सर्वांना माहिती आहे, माझ्या विरोधात चुकीचा गुन्हा लावण्यात आला आहे. ईडी मला अटक करणार आहे आणि मी अटक व्हायला जाणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.संजय राऊत झुकणार नाहीत, त्यांच्यावर चुकीची कारवाई करण्यात येत आहे. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीनं फासावर लटकवलं तरी ते शिवसेना सोडणार नाहीत. शेवटच्या श्वासापर्यंत ते उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहेत. ईडीनं आज मैत्री बंगल्यावर छापा टाकला. तीन मजल्यांची तपासणी केली आहे. संजय राऊतांनी राज्यसभा निवडणुकीसाठी दिलेली कागदपत्रं ईडीला देण्यात आली आहेत. ईडीला पत्राचाळ प्रकरणी एकही कागद मिळालेला नाही. संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहेत. जे पळून गेले आहेत त्यांच्यासाठी हा मेसेज आहे. संजय राऊत शेवटपर्यंत शिवसेनेसोबत राहणार आहेत.
खासदार संजय राऊत म्हणाले, “माझ्याकडे कोणतेही कागदपत्रे सापडली नाहीत. ते जी पत्राचाळ म्हणत आहेत तो पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे हेही मला माहिती नाही. ती चाळ कुठे आहे मला माहिती नाही. परंतु तरीही शिवसेना तोडायची, माझा आवाज बंद करायचा, उद्धव ठाकरेंना कमकुवत करायचं हे ठरलं आहे. त्यासाठीच ही कारवाई आहे. मात्र, अशा कारवाईने महाराष्ट्र, शिवसेना कमकुवत होणार नाही. उलट आजच्या माझ्यावरील कारवाईने शिवसेना आणि महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळणार असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे.”ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊतांनी फोनवर बोलत अशा कारवायांपुढे झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ते टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
“महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधकांवर राजकीय सुडाने कारवाया सुरू आहेत. त्याविरोधात माझ्यावरील कारवाईने बळ मिळेल. आमच्यासारखे काही लोक आहेत जे न झुकता, न घाबरता कारवायांना सामोरं जातात आणि लढाई लढतात, असा संदेश जाईल. अशा कारवायांच्या भीतीने अनेकजण पक्ष सोडून जातात, शरणागती पत्करतात. मात्र, संजय राऊत त्यातील नाही. मरेन पण झुकणार नाही, वाकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.संजय राऊत म्हणाले, “जी कारवाई व्हायची ती होऊ दे, मी घाबरत नाही. राजकीय सुडापोटी हा सर्व खेळ सुरू आहे. माझा पक्ष माझ्या पाठीशी आहे. उद्धव ठाकरे, शिवसैनिक यांचं माझ्यामागे बळ आहे. संजय राऊतला शिवसेनेमुळे राज्य व देश ओळखतो. संजय राऊत कधीच गुडघ्यावर चालत नाही, सरपटत नाही. निधड्या छातीने उभा राहतो आणि लढतो. त्यामुळे या कारवाईला देखील मी निधड्या छातीने सामोरं जाणार आहे. यातूनच महाराष्ट्राला बळ मिळेल.”
संजय राऊत पुढे म्हणाले, “माझ्याकडे कोणतेही कागदपत्रे सापडली नाहीत. ते जी पत्राचाळ म्हणत आहेत तो पत्रा गंजलेला आहे की स्टीलचा आहे हेही मला माहिती नाही. ती चाळ कुठे आहे मला माहिती नाही. परंतु तरीही शिवसेना तोडायची, माझा आवाज बंद करायचा, उद्धव ठाकरेंना कमकुवत करायचं हे ठरलं आहे. त्यासाठीच ही कारवाई आहे. मात्र, अशा कारवाईने महाराष्ट्र, शिवसेना कमकुवत होणार नाही. उलट आजच्या माझ्यावरील कारवाईने शिवसेना आणि महाराष्ट्राला लढण्याचं बळ मिळणार असेल तर मी माझं बलिदान द्यायला तयार आहे.”