मुंबई-“आपल्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली असून, आपल्या राष्ट्रपती आदिवसी समाजाच्या आहेत. यावर्षी तरी आम्हाला असं उत्तर अपेक्षित नव्हतं. हे कार्य, पाप आमचं, तुमचं नाही. जेव्हा आपण आदिवासी ठिकाणी जातो, तेव्हा तिथे गेल्यानंतर राजकारणी म्हणून आपल्याला तेथील स्थिती पाहून लाज वाटली पाहिजे. ७५ वर्षांपासून ही स्थिती आहे. प्रश्न राखीव ठेवलेला असतानाही कुपोषणामुळे मृत्यू होत नाहीत, असं उत्तर मिळत आहे,” असा आक्षेप आदित्य ठाकरेंनी घेतला.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. राज्यात कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही, असं उत्तर बुधवारी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिलं होतं. यावर तीव्र आक्षेप घेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी योग्य ती आकडेवारी द्यावी, दिशाभूल करू नये, अशी मागणी केली होती. त्यानंतर आजही कुपोषणामुळे एकही मृत्यू नाही या दाव्यावर गावित ठाम राहिले. आदिवासी विकास मंत्र्यांच्या याच उत्तराने राष्ट्रवादीच्या नेत्यांसह शिवसेना आमदार आदित्य ठाकरेही बोलले आदित्य यांनी वापरलेल्या ‘ लाज वाटली पाहिजे’सभागृहात मोठा गदारोळही झाला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षातही आदिवासी भागात कुपोषणाची स्थिती गंभीर असेल तर लाज वाटायला हवी, असे वक्तव्य विधानसभेत आदित्य ठाकरेंनी केले. ‘लाज वाटायला हवी’ या वक्तव्यावरून सत्ताधारी आणि आदित्य ठाकरे व शिवसेना आमदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेत हे वक्तव्य मागे घ्यावेत, अशी मागणी केली. त्यानंतर विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नियमांचा दाखला देत हे वक्तव्य मागे घेतले.