शिर्डी-मधल्या काळात विविध आरोप करून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. राजकीय प्रवासात काही लोक माझ्याजवळ आले. ते मोठ्या जागेवर जाऊन बसले. नंतर त्यांनीच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. आज त्यांनाच त्रास होतोय. त्यांना वाटत असेल तर आज नाथा भाऊ सोबत असते तर परिस्थिती वेगळी असती‘
एकनाथ खडसे आज शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे भाष्य केलं. शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदाचा हट्ट नाही. निवडणुकीपूर्वी जे ठरलंय त्याची अंमलबजावणी व्हावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये नक्की काय ठरलंय? ते बाहेर यायला हवं. सर्वांना कळायला हवं. ज्यांच्यासमोर हे ठरलंय त्यांनीही त्यावर बोलायला हवं, असं खडसे म्हणाले. निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं अनेकदा स्पष्ट केलंय. त्यामुळे आमच्यासाठी फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
साधारणपणे लोक विजयी झाल्यावर साईबाबाच्या दर्शनाला येतात. मी आताच आलोय. राज्यात स्थिर सरकार येऊ दे, असं साईबाबांना साकडं घातलंय, असं सांगतानाच राज्यात महायुतीचंच सरकार येईल. दोन्ही पक्षातील वाद, ताणतणाव मिटतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधीमंडळाचा नेता म्हणून सर्वांची मान्यता आहे. फडणवीस हे सर्वात मोठ्या पक्ष्राचे नेते आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. शिवसेनेचे त्यास दुमत असू शकेल. त्यांची मागणी कोणत्या आधारावर हे शिवसेनाच सांगू शकेल, असंही त्यांनी सांगितलं शिवसेनेचा जे ठरलंय त्याची अंमलबजावणी व्हावी असा शिवसेनेचा आग्रह आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमध्ये नक्की काय ठरलंय? ते बाहेर यायला हवं. सर्वांना कळायला हवं. ज्यांच्यासमोर हे ठरलंय त्यांनीही त्यावर बोलायला हवं, असं खडसे म्हणाले. निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री असतील असं अनेकदा स्पष्ट केलंय. त्यामुळे आमच्यासाठी फडणवीस हेच मुख्यमंत्री आहेत, असंही त्यांनी सांगितलं.