शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांचे मोठे बंधू आहेत, त्यामुळे त्यांनी असे बोलू नये. शिवसेना तर तुमच्यामुळेही फुटली होती, असे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे, झी २४ तास वर राज ठाकरे यांनी मुलखात दिली यात बोलताना त्यांनी ,उद्धव ठाकरे हे विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत, मी त्यांना जास्त जवळून ओळखतो, असे विधान राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखती दरम्यान केले. त्याला आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांना मोठ्या भावाबद्दल असे बोलू नका, असे आवाहन केले आहे.पुढे खैरे म्हणाले की, उद्धव ठाकरे हे राज यांचे मोठे भाऊ आहेत, तेव्हा त्यांच्याबद्दल अशी टीका करणे योग्य नाही. शिवसेना जेव्हा फुटली होती तेव्हा राज ठाकरे हे देखील त्याला कारणीभूत होते. त्यावेळी ते औरंगाबादेत आले असताना त्यांचा मलाही फोन आला होता. मी त्यांना असे का केले हे विचारले होते. तेव्हा त्यांनी मला, मी तुम्हाला माझ्याकडे बोलवत नाही, पण माझ्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही रोखू नका, असे सांगितले होते.
राज ठाकरे यांच्या बद्दल आम्हाला खूप आदर आहे, ते ठाकरे घराण्यातील महत्वाचे व्यक्तीमत्व आहे, त्यामुळे त्यांनी मोठ्या भावाबद्दल बोलू नये, एवढेच मला स्पष्ट म्हणायचे आहे, असे खैरे यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाहीत, ते बोलतात वेगळे आणि करतात वेगळे, अशा भावना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या. उद्धव ठाकरे मनसेला युतीसाठी टाळी देणार असल्याच्या चर्चांबाबत विचारले असता, राज ठाकरेंनी उत्तर दिले. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना भेटायला गेलो, हा भावना आणि आजारपणाचा विषय म्हणून ठीक आहे, पण त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
2014 आणि 2017 अशा दोन वेळेला निवडणुकांच्या वेळी शिवसेना मनसेला टाळी देणार असल्याची चर्चा होती, यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, की ‘तो माणूस बोलतो वेगळे, करतो वेगळे. विश्वास ठेवण्यासारखे नाहीये काही, मला बाकीच्यांचे वाईट वाटते, हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. बाळासाहेबांनी दादू हॉस्पिटलमध्ये असल्याचा फोन केला होता, तेव्हा मी धावत भेटायला गेलो, तो भावना आणि आजारपणाचा विषय ठीक आहे. परंतु मला माहित आहे तो (उद्धव). अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहित नाही, इतक्या जवळून मला माहिती आहे.’ असे राज ठाकरे म्हणाले.