पुण्यात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात घुसलेल्या राष्ट्रवादीच्या महिलांना भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर मारहाण केल्याने अलीकडे राजकारणात खूपच सक्रीय होऊ पाहणाऱ्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी मोठ्ठच मोठ्ठ् वक्तव्य केलं आहे . त्यांनी ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. महिलांवर हात उचलाल तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावु , केंद्रातल्या जर्शी म्हशीला गोबर गॅसची आठवण करून देऊ. जसे पेराल तसे ऊगवुन देऊ. असे त्यांनी म्हटले आहे . आता हे कोणाला कसे लागेल हे सर्वानांच ठाऊक आहे.
तसे पाहायला गेले तर टीव्ही आणि भाषिक सिनेमात आता तसं काही उरलेलं नाही ,भाषिकच काय पण बॉलीवूड ची देखील वाईट अवस्था आहे . अनेकांनी फसवणुकीचे ,लुटारूपणाचे धोरण ठवल्याने आणि त्यांनाच ‘लॉबी’ ने मुगुटमनी बनविल्याने अशा गोलमाल लोकांनी तर ‘माल कमविला पण सिनेसृष्टीची मोठी हानी करून ठेवली . त्यात मोबाईल वर करमणूक, कोरोनाची २ वर्षे अशा संकटाने सिनेमा आता लयास जातो कि काय अशी स्थिती निर्माण झाली ? पूर्वी असे म्हणतात सिनेमात दाऊद चा पैसा यायचा पण पूर्वीच्या काळात सिनेमाला मोठे महत्व होते त्यामुळे तो दस पट होऊन माघारी यायचा .आता राजकारण आणि बिल्डर लॉबी तून सिनेमाला पैसा येऊ लागलाय पण तथाकथित ‘मुगुटमनी’ च्या कारभाराने आलेला निर्माता पुन्हा या सृष्टीत यायला नकोच म्हणतो , त्यामुळे आता रिटायर व्हायच्या आधीच कलाकार राजकारणात घुसू लागले आहेत .पण हि घुसखोरी करताना अनेकांना कठीण कठीण डॉयलॉग फेकावे लागत आहेत .नवनीत राणा ,केतकी चितळे ,अशी यादी आहे ज्यांच्यावर जरी त्यांची ट्विटर वरील डॉयलॉगबाजी वाढली असली तरीही … दिपाली सय्यद त्यातल्या नाहीत,त्यांनी यापूर्वी निवडणुकाही लढविल्या आहेत .कित्येक वर्षे त्या राजकारणात आहेत ,आणि राजकारणात त्यांनी आपली वेगळी वाटचालही ठेवली आहे. पण आता त्यांच्या या डॉयलॉगबाजीने हि वाटचाल आणखी वेगळे रूप घेऊ पाहणार काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.