उद्धव ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल-मंत्री शंभूराज देसाई
पुणे – नागपूरचे राज्यविधिमंडळ अधिवेशनाने राजकीय वातावरण तापले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अचानक दिल्लीला रवाना झालेत. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. फडणवीस पुणे येथे आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना अचानक दिल्लीहून निरोप आल्याचे समजते. त्यांनी मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच ते तातडीने पुण्याहूनच दिल्लीला रवाना झाले. फडणवीस यांना दिल्लीहून कशासाठी बोलावणे आले, याची चर्चा सुरू झालीय.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या निलंबनामुळे विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी नागपूर येथे विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार टाकलाय. विधिमंडळाच्या पायऱ्यावर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.महाविकास आघाडी सरकार असताना भाजप नेत्यांनीच भुखंड घोटाळाप्रकरणी ‘आयएल’ दाखल केली होती. त्यांनीच एकनाथ शिंदेंचा भुखंड घोटाळा पुढे आणला, असा दावा अजित पवार यांनी केला आहे.
दिशा सालियानप्रकरणी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला. पटोले म्हणाले, फडणवीस यांनी दिशा सालियानप्रकरणी चुकीची माहिती दिली. त्यामुळे त्यांच्यावर सोमवारी हक्कभं प्रस्ताव आणण्यात येणार आहे.
उद्धव ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल-मंत्री शंभूराज देसाई
उमेश कोल्हे हत्याकांड प्रकरणाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार रवी राणा यांनी याप्रकरणी ‘एसआयटी’ चौकशीची मागणी केली. हे हत्याकांड झाले तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना फोन केला, असा दावा त्यांनी केला. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंच्या फोनची गुप्तचर विभागाकडून चौकशी होईल, अशी घोषणा केलीय.