नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, 700 हून अधिक शेतकरी कुटुंबांचे बलिदान, ज्यांच्या सदस्यांनी या न्यायाच्या लढाईत आपले प्राण दिले, त्यांचे बलिदानाचे चीज झाले आहे. आज आज सत्य, न्याय आणि अहिंसेचा विजय झाला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली त्यानंतर केंद्र सरकारवर निशाणा साधत सोनिया गांधी म्हणाल्या की, आज सत्तेत असलेल्यांनी शेतकरी आणि मजुरांच्या विरोधात रचलेले षडयंत्र हरले आहे, हुकूमशाही राज्यकर्त्यांचा अहंकारही त्यामुळे नष्ट झाला आहे. आज रोजीरोटी आणि शेतीवर हल्ला करण्याचा कट फसला आहे. आणि अन्नदात्यांचा विजय झाला आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या.