मुंबई -‘साजिशे लाखो बनती हैं मेरी हस्ती मिटाने के लिए… ये जनता की दुवाऐं है उन्हे मुक्कमल नहीं होने देती…’ असे म्हणत त्यांनी न्यायालयाच्या निकालावर छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली
पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ‘आमच्यावर खोटे आरोप करण्यात आले. आमच्यावर मीडिया ट्रायल झाली. सव्वा दोन वर्षापेक्षा अधिक काळ यासाठी तुरुंगामध्ये राहावे लागले. या प्रकरणात एका पैशाचाही घोटाळा झाला नसल्याचे आम्ही वारंवार सांगत होतो. तेच आम्ही कोर्टात सांगितले आणि आज आम्हाला त्या प्रकरणामधून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे’ असे भुजबळांनी म्हटले. पुढे बोलताना ते म्हणाले की,’माझ्यावर खोटे आरोप करण्यात आले होते. विनाकारण मला तुरुंगात राहावे लाहले. आता गणेशोत्सच्याआधी आमच्यावरील संकट हे दूर झालेले आहे. सत्य परेशान हो सकता हैं… लेकीन पराजित नही…’ असे भुजबळ म्हणाले.पवारसाहेबांचे, जयंतराव-अजितदादांचे आभार… त्यांनी मला मंत्रिमंडळात घेतले, यासोबतच उद्धवजींचेही आभार, कठीण काळात माझ्यामागे आणि कुटुंबामागे उभे राहिलेल्या प्रत्येकाचे आभार…’ असे भुजबळ म्हणाले आहेत.