पुणे-आज जेंव्हा भाजपा जमेल त्या मार्गाने सत्ता परत हस्तगत करण्यासाठी कोणताही विधी निषेध न
पाळता ज्या लोकांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले व ज्यांच्या विरोधात २०१४ साली लढले त्यानांच
आज आमिषे दाखवून जाहीर पक्षप्रवेश देत आहे. भाजपा ला सत्तेसाठी कशाचेही वावडे नाही अशा
परिस्थितीत काँग्रेसकडे मात्र विचारांवर निष्ठा ठेवून लढणारे बरेच जण आकर्षित होत आहेत. आज
पुण्यात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव श्री.मधुसूदन मिस्त्री काँग्रेस पक्षाचे राज्यसभेचे
माजी खासदार व माजी लोकसभा खासदार ह्यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली रचनात्मक काँग्रेसची
महत्वपूर्ण बैठक एस. एम. जोशी सभागृह येथे पार पडली. काँग्रेस पक्षाचे माजी आमदार उल्हासदादा
पवार, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मोहन जोशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेअंकुश काकडे, काँग्रेस
पक्षाचे आमदार मा. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत हया बैठकीत रचनात्मक कार्य करणारे
समाजातील विविध व्यक्ती व संघटना काँग्रेस पक्षाच्या राजकीय प्रवाहाशी कसे जोडले जातील यावर
सखोल चर्चा झाली. अध्यक्षीय भाषणात श्री. मधुसूदन मिस्त्री ह्यांनी धर्मांध शक्ती सोबत मुकाबला
करण्यासाठी उपस्थित सर्वांना काँग्रेस सोबत येण्यास आवाहन केले. या बैठकीला सर्व थरातील
सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत हजर होते. सर्वांनीच आजच्या देशासमोरील संकटांना व विविध प्रश्नांना
तोंड देण्यासाठी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे व विशेष करून धर्मांध ताकदींना थोपवण्यासाठी हे
एकत्र येणे काळाची गरज आहे असे मत मांडले. देशाचे ऐक्य व अखंडत्व हे धोक्यात आले आहे. आज
झुंडशाही, संविधानिक मूल्यांना दिली जाणारी तिलांजली, संस्थाच्या स्वायत्ततेला निर्माण झालेला धोका
ह्यामुळे व बहुमतवादामुळे देशात यादवी होईल इतकी गंभीर परिस्थिती देशासमोर आहे.
यामुळे सर्वांनीच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्षांना येत्या महाराष्ट्र राज्य विधानसभा
निवडणुकीत देशहीतासाठी भरघोस मतदान करावे.
स्त्रिभृणहत्या रोखण्यासाठी गेले २५ वर्षे सतत लढवय्येपणे समाजकार्य करणाऱ्या गांधीवादी
ॲड. वर्षाताई देशपांडे, गांधी स्मारक निधी चे अन्वर राजन, कायदेतज्ञ व सामाजिक कार्यकर्ते श्री.
असिम सरोदे, किर्तनकार व कवी श्यामसुंदर सोन्नर महाराज, फ्रेंडस् ऑफ डेमोक्रसीचे डॉ. विवेक कोरडे,
टिचर्स डेमोक्रॅटीक फ्रंट चे श्री. हिरालाल पगडाल, सेवादलचे श्री. श्रीकांत लक्ष्मी शंकर, ग्रामश्री संस्थेच्या
ॲड. प्रभा सोनटक्के, अलीभाई शेख, ॲड. एम एस शिंदे, श्री. विकास निकुम्ब, माथेरानचे माजी
नगराध्यक्ष मनोज खेडकर, सातारचे माजी नगरसेवक रविंद्र झुटींग, पर्यावरण चळवळीचे युवक कार्यकर्ते
ह्रृषिकेश पाटील, दिपेंती चिकणे, संतोष देशपांडे, ॲड. चैत्रा, ॲड. वनराज पवार, शाहिर कैलास
जाधव, ॲड. शैलजा जाधव यांनी ह्यापुढे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षासाठी समाजात
जागरुकता निर्माण करण्याचा निर्णय आज जाहिर केला.
पुरोगामी, विवेकवादी, समाजवादी, डावे व गांधीवादी ह्या सर्वांची ताकद विखुरलेल्या अवस्थेत
असली तरी ती फार मोठी आहे व येत्या निवडणुकीत त्याचा प्रभाव नक्की जाणवेल.
त्यामुळे प्रत्येक मतदाराने देशहीतासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांनाच मतदान
करावे असे आवाहन पुरोगामी विचारवंत व संघटनांनी केले आहे.