कॉंग्रेसचे सरकार गेल्यावरच डॉ. आंबेडकरांना ‘भारत रत्न ‘ने सन्मानित केले गेले.
थिरुवअनंतपुरम :काँग्रेस भारतातून नष्ट होतेय अन् जगातून कम्युनिस्ट नष्ट होत आहे अशा शब्दात आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या मुळ विरोधकांवर हल्ला केला . या दोन्ही पार्त्यांनी गरीब दलितांची कायम फसवणूक केली त्यांच्यासाठी काही केले नाही केवळ त्यांची मते खेच्याचे राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला केरळमधील थिरुवअनंतपुरम इथं भाजपच्या अनुसुचित जाती-जमाती परिषदेत शहा बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपनं SC-ST समाजासाठी केलेल्या कामांची माहिती दिली. तसेच काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीवर टीका करताना त्यांनी केवळ या समाजांचा व्होट बँक म्हणूनच वापर केल्याचा आरोप केला.शहा म्हणाले,एस सी आणि एस टी समजतील ५ करोड नागरिकांना उज्वला योजनेचा लाभ मिळाला याच समजासाठी शौचालय योजनेचा फायदा दिला गेला ८ करोड नागरिकाच्या घरात नळाद्वारे पाणी दिले गेले त्यातही ५ करोड दलित नागरिकांचा समावेश होता , काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी कधीही गरिबांसाठी काम केलं नाही. तसेच काँग्रेस भारतातून संपतेय, अशा शब्दांत शहा यांनी म्हटलं आहे.देशातून काँग्रेस संपत चालली आहे. तर जग कम्युनिस्ट पार्टीपासून मुक्त होत आहे. जर केरळला भविष्य असेल तर ते केवळ भाजपसोबतच आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टीनं कधीही अनुसुचित जमाती आणि गरीबांसाठी काम केलं नाही, त्यांनी यांना केवळ व्होट बँक असंच समजलं.जोपर्यंत कॉंग्रेसचे सरकार देशात होते तोवर नाही तर कॉंग्रेसचे सरकार गेल्यावरच डॉ आंबेडकर यांना भारत रत्न पुरस्कार दिला गेल्याचे त्यांनी सांगितले.