औरंगाबाद -खासदार इम्तियाज जलील यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभा आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती होऊ नये असे खासदार जलील यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी सभेच्या आधी आमच्या सोबत इफ्तारसाठी यावे, आणि हिंदु- मुस्लिम ऐक्य दाखवावे असे खासदार जलील यांनी म्हटले आहे.99 टक्के लोक असतात ज्यांना शांतता हवी असते, मात्र 1 टक्के लोकांना शातंता नको असते, पोलिसांवर विश्वास आहे, ते शहरात शांतता ठेवतीलच. मात्र जे राजकारण करण्यासाठी शहरात येत आहे, त्यांनी राजकारण करावे, आणि ज्यांना प्रार्थना करायची आहे, त्यांना प्रार्थना करू द्यावी असे म्हणत राज ठाकरेंना टोलाही लगावला आहे.
भोंगा हा हिंदु – मुस्लिमाचा मुद्दा नाही
हिंदुत्व दाखवण्यासाठी मनसे, शिवसेना आणि भाजपमध्ये चढाओढ सुरू आहे, असा टोला जलील यांनी लगावला आहे. भोंगा हा हिंदु आणि मुस्लिम हा मुद्दा नाही. औरंगाबादमध्ये शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजे असे खासदार जलील यांनी म्हटले आहे. आम्ही शिवसेनेविरोधात बोलूू शकतो, मात्र धर्मांच्या नाही असेही त्यांनी म्हटले आहे.गेली दोन वर्षे हिंदु असो की मुस्लिम कुणालाच कोणतेच सण साजरे करता आले नाहीत. आता कुठेतरी सर्व व्यावसायिकांनी दुकानात माल भरला आहे. आणि जर काही अनुसुचित प्रकार घडला तर यांचा त्रास सर्वांनाच होईल, यामुळे सर्व होऊ नये शांतता प्रस्थापित रहावी यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवे. यासाठी आमची काही मदत लागली तर आम्हीदेखील मदतीला येऊ असे खासदार जलील यांनी म्हटले आहे.
देशाची आणि राज्याची संस्कृती आहे की आम्ही सण सोबत साजरे करतो. राज ठाकरेंच्या सभेआधी त्यांनी आमच्यासह रमजानच्या महिन्यात एकत्र येत इफ्तार करावा असे म्हणत राज ठाकरेंना निमंत्रण दिले आहे. आम्हाला शहराची शांतता भंग होऊ द्यायची नाही.