मुंबई-भाजपा आमदार आशिष शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी आशिष शेलार यांना फोनद्वारे धमकी देण्यात आली होती. आशिष शेलार यांनी याप्रकरणी पत्र लिहून पोलीस आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे. शेलार यांना कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी देत एक अज्ञात इसम अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यामध्ये कशाप्रकारे अंधाधुंदी चालू असल्याचे आपण पाहत आहे. त्यामुळे २४ तासांच्या आत आशिष शेलार यांना ज्याने धमकी दिली आहे त्याच्या मुसक्या आवळा. शेलार आणि त्यांच्या परिवारातील सदस्याला काही झाले तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर असणार आहे,” अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी दिली आहे. चित्रा वाघ यांनी यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“आशिष शेलार आणि त्यांच्या परिवाराविरोधात विखारी भाषा वापरत जिवे मारण्याची धमकी दिली आहे. धमकी देऊन कित्येक तास उलटले तरी कायदा सुव्यवस्था सुस्त पडली आहे. मुख्यमंत्री महोदय तुम्ही सरकार काय तालिबान्यांना चालवायला दिले आहे का? राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. त्यामुळे राज्यामध्ये सरकार नावाची कोणती गोष्ट शिल्लक आहे का? मुख्यमंत्री स्वतः हॉलिडे मूडमध्ये आहेत तर गृहमंत्री विकेंड मूडमधून बाहेर आलेले नाहीत.