नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कृती करू नका –
मुंबई- दोन दिवसांचा लॉकडाऊन म्हणता म्हणता तुम्ही तर महिनाभराचा अघोषित लॉकडाऊन लावला नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कृती करू नका आशयाचे पत्र आज मुख्यमंत्री ठाकरे यांना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले आहे.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे जनमानसात असलेली.
अस्वस्थता आणि त्यामुळे तत्काळ काही पाऊले उचलून सर्वसामान्यांना दिलासा.
देण्याबाबत या विषयांतर्गत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात फडणवीस यांनी म्हटले आहे कि,’
राज्यात कोरोनाचा प्रादर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावावे
लागतील, असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा
विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस
लॉकडाऊनसदृश निर्बंध घालण्यात आलेत, त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता
आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करताहेत.
हे निर्बंध
घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजीबात करण्यात आलेला नाही. अनेक
क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा
फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निबंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा
एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार,
छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक
बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर वाहतूक (ट्रान्सपोर्टेशन) खुली ठेवताना गॅॅरेज आणि स्पेअर पार्टस दुकाने मात्र बंद ठेवण्यात
आली आहेत. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत.
त्यामुळे माझी विनंती आहे की, पुन्हा एकदा सर्व छोट्या- छोट्या घटकांशी चर्चा करून
त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरिबांचे जीवन आणि
अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीने नव्याने निर्बधांबाबतची
अधिसूचना जारी करण्यात यावी. कोरोनाला रोखणे महत्त्वाचे आहेच. पण, कोरोना
रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण
होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ यासंदर्भात पाऊले उचलाल,
असा विश्वास वाटतो.