आपल्या बंडाला भाजपचा पाठिंबा आहे, असे एकनाथ शिंदे यांनी आमदारांसमोर जाहीरपणे सांगितल्याचे वृत्त एबीपी माझा ने दिले आहे. तसेच आपल्याला काहीही कमी पडणार नसल्याचा दावा केला. दुसरीकडे दुपारी शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी चोवीस तासांच्या आत येऊन उद्धव ठाकरेंसमोर आपली भूमिका मांडा, असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. यावर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यानंतर महाविकास आघाडीसोबत काँग्रेस असल्याची भूमिका अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांनी मांंडली. नाना पाटोळे यांनी राज्यातील राजकीय महाभारत मागे भाजपच असल्याचा आरोप केला आहे तर दुसरीकडे भाजप नेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाल्याचे समजते.