मुंबई. निर्णय प्रक्रीयेत विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत, काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामीयांनी मोठे विधान केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ठाकरे सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला तर भाजपने शिवसेनेला पाठिंबा देऊन सरकार स्थापन करावे, असे सुब्रमण्यम स्वामींनी वक्तव्य केले आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये निर्णय प्रकीयेत काँग्रेसला विचारात घेतले जात नाही, अशी नाराजी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची बैठकाही झाल्या. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपली खदखद व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये सुरू असलेल्या या तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सूचक वक्तव्य केले आहे.