मुंबई- शिवसेनेनं भाजपसी साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केल्यापासून भाजप सेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. अनेक वेळा भाजपचे नेते शिवसेनेवर आणि विचारधारा बदलून काँग्रेससोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंवर टीका करत असतात. यातच आता भाजपने एका चित्राच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर निशाना साधलाय. भाजपने आपल्या भाजप महाराष्ट्र नावाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक खोचक व्यंगचित्र पोस्ट केले आहे.
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/1233000292322435074/photo/1
व्यंगचित्रात काय आहे ?
स्वांतंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेनाप्रमुखे बाळासाहेब ठाकरे आकाशात भेटले आहेत. त्यात बाळासाहेब ठाकरे सावकरांना म्हणतात, “तात्याराव काय म्हणू आता मी! मला वाटलं होतं पोरगा नाव काढेल. पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली.” भाजपकडून पोस्ट करण्यात आलेल्या या व्यंगचित्रामुळेच नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणूकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. भाजपाला सर्वाधिक जागा मिळूनही सत्तेपासून दूर रहावे लागले. त्यामुळे भाजपने गेल्या तीन महिन्यात अनेकवेळा शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय. आता भाजपच्या या व्यंगचित्राला शिवसेना कोणत्या प्रकारे उत्तर देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरनार आहे.