कलियुगातील,…..”100 मुखी भाजपारुपी रावण” लक्ष्मणाला हनुमाना सहित आपल्याकडे ओढून….! भावा-भावांमध्ये वैर आणण्याचा दृष्ट प्रयत्न करत आहेत….. तो खऱ्या हिंदूंनीच हाणून पाडला पाहिजे. *हिंदुत्वाच सोंग पांघरलेल्या लांडग्यांना वेळीच ओळखा* ….!, असे टि्वट विद्या चव्हाण यांनी केले आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा रविवारी एक मे रोजी औरंगाबादमध्ये पार पडली. यावेळी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे. भोंगे निघणार नसतील तर मग दुप्पट आवाजात मशीदींसमोर हनुमान चालिसा वाजविण्याचे निर्देश त्यांनी मनसैनिकांना दिले. यावरून राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजप हा कलयुगातील 100 तोंडी रावण असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच हिंदुत्वाच सोंग पांघरलेल्या लांडग्यांना वेळीच ओळखण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.