पुणे- अशा पद्धतीने दादागिरी करणाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी थारा देवू नये , तातडीने आमदार संग्राम थोपटे यांची हकालपट्टी करून ६ वर्षे त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना पक्षबंदी घातली पाहिजे अशी मागणी जोर धरते आहे . महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात जागा न मिळाल्यामुळे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्या संतप्त कार्यकर्त्यांनी काल पुण्यातील काँग्रेस भवनात प्रचंड तोडफोड केली. तसेय, संग्राम थोपटेंना योग्य न्याय न मिळाल्यास जिल्ह्यातून काँग्रेसचा हद्दपार करू, अशी भूमिकाही घेतली होती. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिले. संग्राम थोपटे यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल, असे बाळासाहेब थोरात यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले.थोरात यांच्या या वक्तव्यामुळे यामुळे निष्ठावंत थोरात यांच्यावर नाराज होत आहेत . थोपटे कुटुंबाला कॉंग्रेस पक्षाने सांभाळले वाढविले १५ वर्षे मंत्रीपद या कुटुंबात दिले . आता पदा साठी अशा पद्धतीने गुंडागर्दी करणे हे पक्षला लांछ्नास्पद आहे. पक्षाची आब राखायची असेल तर एका आमदाराच्या संख्येची लालसा न धरता तातडीने त्याची हकाळ पट्टी केली पाहिजे अन्यथा ,’म्हातारी मेल्याचे दुखः नाही पण काळ सोकावेल ‘या कडे लक्ष वेधले जाते आहे. पक्षाची स्थिती कमजोर आहे म्हणून अशा गुन्हेगारी दादागिरीला उरावर घेवू नये ,तत्व आणि पक्षाच्या इभ्रतीचा बाळासाहेब थोरात यांनी विचार केला पाहिजे असे म्हणणे मांडले जाते आहे.
दरम्यान थोरात यांनी असे म्हटले आहे कि , “संग्राम थोपटे चांगला कार्यकर्ता आहे, चांगला आमदार आहे. थोपटे कुटुंब पिढ्यान पिढ्या काँग्रेसशी एकनिष्ठ आहे. त्यांचे वडीलही मंत्रिमंडळात होते, मात्र महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार आहे, त्यामुळे वाट्याला आलेल्या जागांचा ताळमेळ घालताना कसरत करावी लागते हे खरे आहे. त्यांना मंत्रिपद देऊ शकलो नाही, कार्यकर्त्यांना राग आहे. मी संग्राम थोपटेंशी बोललो. त्यांचा योग्य वेळी योग्य सन्मान केला जाईल.”
तोडफोडीची माहिती नाही- संग्राम थोपटे
काँग्रेस भवनाच्या तोडफोडीबाबत संग्राम थोपटे यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, मला या तोडफोडीविषयी मला काहीच कल्पना नाही. हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. तीन वेळा आमदार झाल्याने मंत्रिपदाची इच्छा होती, असेही त्यांनी यावेळी सांगितले.