मुंबई -“वाचाळविरांना आवरा हे आम्ही सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जबाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसं वागलं आणि बोललं पाहिजे, याचं भान असायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिलं नाही आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते , विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मंगल प्रसाद लोढा यांची कानउघडणी केली आहे.एखादं उदाहरण देत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेता, हेच चुकीचे आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची आणि शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेची तुलनाच होऊ शकत नाही. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं बोलून कसं चालेल? छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर वादंग अद्याप सुरू असतानाच भाजपचे मंत्री मंगलप्रसाद लोढा यांच्या वक्तव्याने वाद पेटला आहे.किल्ले प्रतापगडावर शिवप्रताप दिन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अन्य नेते तसेच पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. तेव्हा बोलताना मंगलप्रभात लोढा यांनी तुलनात्मक वक्तव्य केले. यानंतर अजित पवार यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट करुन भाजपला चांगलेच ठणकावले.अजित पवार म्हणाले, वाचाळविरांना आवरा हे सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो. परंतु, यांच्यात चूका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली. पण, आपल्यावर जबाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसे वागावे काय बोलावे? याचे भान असायला हवे.अजित पवारांनी लोढांवर टीकास्त्र डागताना म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिले नाही.
काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?
मंत्री लोढा यांनी आज प्रतापगडावर शिवप्रतापदिनी एक वक्तव्य केले. त्यामुळे ते टीकेचे धनी बनले आहेत. ”छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगाजेब बादशहाने आग्र्यात कैद करुन ठेवले होते. पण, शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी बादशहाच्या हातावर तुरी देऊन तिथून निसटले. एकनाथ शिंदे यांनाही रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे हे देखील रोखण्याचा प्रयत्न झाला पण ते बाहेर पडले” असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.